शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील पाच बोटी महापालिकेतून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST

सांगली : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब ...

सांगली : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे. या पाच बोटी नेमक्या कुठे गायब झाल्या, त्या चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांना परस्परच विकल्या, याचा शोध घेण्याची मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

मगदूम म्हणाले की, कृष्णा नदीला पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. महापालिकेकडे यांत्रिकी बोटी नव्हत्या. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अनेक गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या. या बोटी अग्निशमन विभागाकडे होत्या. २००५-०६ नंतर शहरात महापूर आला नाही. २०१९ मध्ये पुन्हा महापुराने शहरात थैमान घातले. तेव्हाही बोटींची कमरतता दिसून आली.

याचदरम्यान प्रशासनाने नव्याने बोटी खरेदीचा विषय स्थायी समितीसमोर पाठविला होता. पण गत महापुरातील सहा बोटींची माहिती घेता, पाच बोटी गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विकल्या आहेत. याबाबत अग्निशमन विभागाकडे माहितीही विचारली. पण अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्थायी समिती सभेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सभापती कोरे यांनी तसे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

संगनमत करून बोटी विकल्या

मगदूम म्हणाले की, अग्निशमन विभागाकडील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या बोटी विकल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अधिकारी, कर्मचारीच महापालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारत आहेत. येत्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी दाखल न झाल्यास स्थायी सभा उधळून लावू, असा इशाराही दिला.