शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत साडेपाच हजार प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

कुपवाड : ‘पंतप्रधान आवास योजने’चा महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत १९ हजार ६३० ठिकाणचा सर्व्हे पूर्ण ...

कुपवाड : ‘पंतप्रधान आवास योजने’चा महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत १९ हजार ६३० ठिकाणचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यातील साडेपाच हजार प्रस्ताव सध्या धूळ खात पडून आहेत. या प्रकरणात त्वरित लक्ष न घातल्यास शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून जाब विचारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रूपेश मोकाशी यांनी दिला आहे.

मोकाशी म्हणाले की, केंद्र शासनाने गरीब लोकांसाठी सन २०१७-१८ मध्ये पंतप्रधान आवास योजना अंमलात आणली. ही योजना राबविण्यासाठी महानगरपालिकेने ठाणे येथील धाराशवा कंपनीला नेमले. या कंपनीने सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व्हे करून १९ हजार ६३४ लोकांना घरांची आवश्यकता असल्याबाबतचा अहवाल तयार केला.

या कामासाठी इंजिनिअर, आर्किटेक्ट व इतर दोन अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. परंतु, कंपनीचे वेतन महानगरपालिकेने न दिल्यामुळे कर्मचारी सर्व्हे सोडून गेले. त्यानंतर महापालिकेने कर्मचारी नियुक्त केले. परंतु, सध्याचे इंजिनियर व इतर कर्मचारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. साडेपाच हजारापेक्षा जास्त प्रस्ताव गेली तीन वर्षे धूळ खात पडून आहेत. त्यापैकी केवळ ८० लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून मिळालेला एक कोटी ७१ लाखांचा निधी महापालिकेकडे गेल्या दीड वर्षापासून पडून आहे.

महापालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर मासिक दोन लाख रुपये खर्च होतात. महापालिकेने या नेमलेल्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांचे त्वरित निलंबन करून न्याय मिळवून द्यावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर उपस्थित होते.

चौकट:

नागरिकांचे दररोज हेलपाटे...

महानगरपालिकेने आलेल्या प्रस्तावाच्या कागदपत्राची पूर्तता करून शासनाकडे पाठवायचे आहेत. यामध्ये महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. ज्या लोकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. ते दररोज महापालिकेकडे हेलपाटे मारत आहेत. या कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.