शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य जीवसृष्टीचे जतन करावे : उगलमुगले

By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST

परिवर्तनचा परिसंवाद : समस्यांवर चर्चा, नियमांचे पालन करण्याची अपेक्षा

गुहागर : मच्छिमारांनी मासेमारी बंदीकाळाचे पालन केले पाहिजे, मत्स्य जीवसृष्टीचे संतुलन राखले पाहिजे. त्याचप्रमाणे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालनही मच्छिमारांनी करावे, असे आवाहन रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले यांनी केले. परिवर्तन संस्था, चिपळूण आणि अ‍ॅक्शन एड असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सागर किनारा नियमन व विकास कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. पर्यटन विकासाला चालना देत आर्थिक स्वावलंबनासाठी वॉटर स्पोर्टसारखे प्रकल्प मच्छिमारांनी राबवावेत. याकरिता सर्वे करुन देणे किंवा अन्य जे करावे लागेल ते मी करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.संरक्षित भिंत, मत्स्य ओटा, मत्स्य रॅम्प आदी कामे फिशरीज व पत्तन विभागाकडे असल्याने त्यांच्याकडे संपर्क साधावा. विकासकामांसाठी आवश्यक ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन मिळवावी. कारण भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंत पोर्ट विभागाचे कार्यक्षेत्र असते. मात्र, सदर जागा पोर्टची असतेच असे नाही. ती जागा खासगीही असू शकते, असे स्पष्टीकरण दाभोळचे बंदर निरीक्षक पाटील यांनी केले.गुहागर तालुक्यातील मच्छिमार समाजाच्या सामाजिक, आर्थिक सर्वेमधून तसेच सर्वेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्राथमिक संवाद बैठकांमध्ये अनेक समस्या पुढे आल्या. यामध्ये शासकीय यंत्रणांचे अपुरे सहकार्य व कायद्याचे अपुरे ज्ञान तसेच संबंधित शासकीय यंत्रणांच्या उपक्रमाविषयी माहिती कमी असल्याने अनेक विकासात्मक कामांचा लाभ येथील मच्छिमारांना मिळू शकला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील मत्स्य विकास खाते, मेरिटाईम बोर्ड आणि महसूल यंत्रणेला जोडून घेऊन त्यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना व कार्यक्रम समजून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.रत्नागिरी जिल्ह्याला १३७ किमी लांबीचा सागरकिनारा लाभला असून, ४८ लँडिंग सेंटर आहेत. सुमारे ६७ हजार मच्छिमार मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात ८० मच्छिमार सहकारी संस्था असून, त्यांच्यामार्फत विविध योजनांचा लाभ मच्छिमार घेत आहेत. यामध्ये मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण, मासळीचे सुरक्षण, पणन व विक्री, बिगर यांत्रिकी नौका बांधणीसाठी लहान मच्छिमारांना अर्थसहाय्य, मच्छिमार संकट निवारण निधी, मच्छिमार बंदरांचा विकास, वीजबिल व डिझेल दरावर सवलत आदी योजनांची माहिती रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी देसाई यांनी दिली. तसेच नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड, राष्ट्रीय कल्याण विकास योजना व नाबार्ड या यंत्रणांचे मत्स्य विकास संदर्भाने असलेले धोरण विषद केले. यावेळी उपस्थित मच्छिमारांनी मत्स्य विकास योजनांमध्ये असलेल्या त्रुटींविषयी मत व्यक्त केले व अपेक्षित बदल सूचवले.सागरकिनारा नियमन कायदा संदर्भाने नायब तहसीलदार विवेक जंगम यांनी माहिती दिली, तर घटनेने दिलेले अधिकार व या अधिकारांच्या प्राप्तीसाठी करावयाचा संघर्ष याविषयी अ‍ॅड. अमिता कदम यांनी माहिती दिली. समाजाच्या व्यापक हितासाठी जनहित याचिका (पीआयएल) चा प्रभावी साधन म्हणून वापर कसा करता येईल, याविषयी त्यांनी माहिती देऊन या प्रक्रियेत मच्छिमारांना सहकार्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमप्रसंगी प्रशासकीय अधिकारी आणि मच्छिमार यांच्यात अपेक्षित हेतूने संवाद प्रक्रिया व्हावी यादृष्टीने अशोक कदम, कार्यकारी संचालक परिवर्तन यांनी मार्गदर्शन केले. परिवर्तनचे क्षेत्रीय समन्वयक केतन गांधी यांनी प्रस्तावना करताना परिवर्तन संस्थेच्या कामाचे मुद्दे, कामाची पद्धत, हाताळलेले विषय आणि मिळालेल्या यशाबाबत माहिती दिली. गणेश खेतले यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश नाटेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)सागरी सुरक्षाविषयक नियमांचे मच्छिमारांनी पालन करण्याची सूचना.गुहागर तालुक्यातील परिसंवादात अनेक गोष्टी आल्या पुढे. शासकीय यंत्रणेने मच्छिमार बांधवांसाठी अधिक योजना खुल्या करण्याच्या सूचना. संरक्षक भिंत, ओटा, मत्स्य रॅम्प कामे झटपट होण्याची अपेक्षा. जिल्ह्यात ४८ लँडिंग सेंटर, ६७ हजार मत्स्य अवलंबित.