शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

मत्स्य जीवसृष्टीचे जतन करावे : उगलमुगले

By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST

परिवर्तनचा परिसंवाद : समस्यांवर चर्चा, नियमांचे पालन करण्याची अपेक्षा

गुहागर : मच्छिमारांनी मासेमारी बंदीकाळाचे पालन केले पाहिजे, मत्स्य जीवसृष्टीचे संतुलन राखले पाहिजे. त्याचप्रमाणे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालनही मच्छिमारांनी करावे, असे आवाहन रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले यांनी केले. परिवर्तन संस्था, चिपळूण आणि अ‍ॅक्शन एड असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सागर किनारा नियमन व विकास कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. पर्यटन विकासाला चालना देत आर्थिक स्वावलंबनासाठी वॉटर स्पोर्टसारखे प्रकल्प मच्छिमारांनी राबवावेत. याकरिता सर्वे करुन देणे किंवा अन्य जे करावे लागेल ते मी करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.संरक्षित भिंत, मत्स्य ओटा, मत्स्य रॅम्प आदी कामे फिशरीज व पत्तन विभागाकडे असल्याने त्यांच्याकडे संपर्क साधावा. विकासकामांसाठी आवश्यक ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन मिळवावी. कारण भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंत पोर्ट विभागाचे कार्यक्षेत्र असते. मात्र, सदर जागा पोर्टची असतेच असे नाही. ती जागा खासगीही असू शकते, असे स्पष्टीकरण दाभोळचे बंदर निरीक्षक पाटील यांनी केले.गुहागर तालुक्यातील मच्छिमार समाजाच्या सामाजिक, आर्थिक सर्वेमधून तसेच सर्वेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्राथमिक संवाद बैठकांमध्ये अनेक समस्या पुढे आल्या. यामध्ये शासकीय यंत्रणांचे अपुरे सहकार्य व कायद्याचे अपुरे ज्ञान तसेच संबंधित शासकीय यंत्रणांच्या उपक्रमाविषयी माहिती कमी असल्याने अनेक विकासात्मक कामांचा लाभ येथील मच्छिमारांना मिळू शकला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील मत्स्य विकास खाते, मेरिटाईम बोर्ड आणि महसूल यंत्रणेला जोडून घेऊन त्यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना व कार्यक्रम समजून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.रत्नागिरी जिल्ह्याला १३७ किमी लांबीचा सागरकिनारा लाभला असून, ४८ लँडिंग सेंटर आहेत. सुमारे ६७ हजार मच्छिमार मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात ८० मच्छिमार सहकारी संस्था असून, त्यांच्यामार्फत विविध योजनांचा लाभ मच्छिमार घेत आहेत. यामध्ये मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण, मासळीचे सुरक्षण, पणन व विक्री, बिगर यांत्रिकी नौका बांधणीसाठी लहान मच्छिमारांना अर्थसहाय्य, मच्छिमार संकट निवारण निधी, मच्छिमार बंदरांचा विकास, वीजबिल व डिझेल दरावर सवलत आदी योजनांची माहिती रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी देसाई यांनी दिली. तसेच नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड, राष्ट्रीय कल्याण विकास योजना व नाबार्ड या यंत्रणांचे मत्स्य विकास संदर्भाने असलेले धोरण विषद केले. यावेळी उपस्थित मच्छिमारांनी मत्स्य विकास योजनांमध्ये असलेल्या त्रुटींविषयी मत व्यक्त केले व अपेक्षित बदल सूचवले.सागरकिनारा नियमन कायदा संदर्भाने नायब तहसीलदार विवेक जंगम यांनी माहिती दिली, तर घटनेने दिलेले अधिकार व या अधिकारांच्या प्राप्तीसाठी करावयाचा संघर्ष याविषयी अ‍ॅड. अमिता कदम यांनी माहिती दिली. समाजाच्या व्यापक हितासाठी जनहित याचिका (पीआयएल) चा प्रभावी साधन म्हणून वापर कसा करता येईल, याविषयी त्यांनी माहिती देऊन या प्रक्रियेत मच्छिमारांना सहकार्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमप्रसंगी प्रशासकीय अधिकारी आणि मच्छिमार यांच्यात अपेक्षित हेतूने संवाद प्रक्रिया व्हावी यादृष्टीने अशोक कदम, कार्यकारी संचालक परिवर्तन यांनी मार्गदर्शन केले. परिवर्तनचे क्षेत्रीय समन्वयक केतन गांधी यांनी प्रस्तावना करताना परिवर्तन संस्थेच्या कामाचे मुद्दे, कामाची पद्धत, हाताळलेले विषय आणि मिळालेल्या यशाबाबत माहिती दिली. गणेश खेतले यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश नाटेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)सागरी सुरक्षाविषयक नियमांचे मच्छिमारांनी पालन करण्याची सूचना.गुहागर तालुक्यातील परिसंवादात अनेक गोष्टी आल्या पुढे. शासकीय यंत्रणेने मच्छिमार बांधवांसाठी अधिक योजना खुल्या करण्याच्या सूचना. संरक्षक भिंत, ओटा, मत्स्य रॅम्प कामे झटपट होण्याची अपेक्षा. जिल्ह्यात ४८ लँडिंग सेंटर, ६७ हजार मत्स्य अवलंबित.