इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांनी घेतलेल्या ऊर्जा संवर्धन स्पर्धेत येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामधील राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.
महाऊर्जाने फेब्रुवारी २०१९ मध्ये ही स्पर्धा घेतली होती. यामध्ये राज्यातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि सहकारी संस्था गटातून ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत गेल्या वर्षभरात ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात आला. आरआयटीच्या विद्युत विभागाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या ऊर्जा संवर्धन कामाचे सादरीकरण केले. आरआयटीने ३०० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. एलईडी विद्युतीकरणासह ऊर्जा बचतीसाठी अनेक उपकरणांचा केलेला वापर महत्त्वाचा ठरला. प्रा. डॉ. एच. टी. जाधव, प्रा. डॉ. ए. बी. काकडे, प्रा. डोडमिसे, श्रीप्रसाद कदम यांनी स्पर्धेत सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी सचिव प्रा. आर. डी. सावंत, संचालिका प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी, विद्युत विभागप्रमुख प्रा. डॉ. वैजू कलखांबकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०५ इस्लामपुर ५
ओळ : महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा विभागाने घेतलेल्या ऊर्जा संवर्धन स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. वैजू कलखांबकर, डॉ. ए. बी. काकडे.