शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : जगाला शांततेचा संदेश देत असताना, अंधश्रध्दा नाहीशी व्हावी आणि मानव निसर्गवादी बनावा, निर्भीड बनावा यासाठी भगवान गौतम बुध्दांनी जगाला अनेक तत्त्वे दिली. निसर्गवादाबरोबर मानवतावादही त्यांनीच दिला. बुध्द विचाराने जगाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी केले.येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्यावतीने गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्त कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आयोजित पहिल्या परिवर्तनवादी कविसंमेलनात ते बोलत होते. स्मशानभूमीत आयोजन होणारे हे पहिलेच कविसंमेलन ठरल्याचे ‘लोकराज्य’चे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. माजी नगरसेवक विजय कुंभार अध्यक्षस्थानी होते. कुंभार म्हणाले की, स्मशानभूमी हे आयुष्याला पूर्णविराम देणारे ठिकाण आहे. मात्र लोकराज्यमुळे स्मशानभूमी परिवर्तनाचे व्यासपीठ बनतील. समाजाने गौतम बुध्दांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव अरुण कांबळे, प्रा. रामचंद्र घुले, सागर मलगुंडे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात बजरंग गावडे यांनी ‘स्मशानातून स्मशानाकडे जाताना अखेर निराशा झाली, प्रेतासमोर शितोंडी धरताना परकी सारी आपली झाली’ ही कविता सादर केली. डॉ. मीनाक्षी नांगरे, रवी बावडेकर, भानुदास आंबी, सुधीर बंडगर, राजेंद्र शिंदे, विजय जाधव, पी. व्ही. मुळे, चंद्रकांत कणेरे, रामचंद्र गलांडे यांनीही कविता सादर केल्या.यावेळी नगरसेवक अमित ओसवाल, प्रा. डॉ. जयवंत खरात, पोपट कोळेकर, सागर चव्हाण, अशोक पाटील, प्रा. अरुण घोडके, निरंजन पाटील, वैभव खोत, विकास वाघमोडे, विवेक तांदळे, विनोद राठोड, आकाश कुचीवाले, विवेक जगताप, ऋषिकेश पाटील उपस्थित होते. मानसिंग ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले.