शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : जगाला शांततेचा संदेश देत असताना, अंधश्रध्दा नाहीशी व्हावी आणि मानव निसर्गवादी बनावा, निर्भीड बनावा यासाठी भगवान गौतम बुध्दांनी जगाला अनेक तत्त्वे दिली. निसर्गवादाबरोबर मानवतावादही त्यांनीच दिला. बुध्द विचाराने जगाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी केले.येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्यावतीने गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्त कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आयोजित पहिल्या परिवर्तनवादी कविसंमेलनात ते बोलत होते. स्मशानभूमीत आयोजन होणारे हे पहिलेच कविसंमेलन ठरल्याचे ‘लोकराज्य’चे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. माजी नगरसेवक विजय कुंभार अध्यक्षस्थानी होते. कुंभार म्हणाले की, स्मशानभूमी हे आयुष्याला पूर्णविराम देणारे ठिकाण आहे. मात्र लोकराज्यमुळे स्मशानभूमी परिवर्तनाचे व्यासपीठ बनतील. समाजाने गौतम बुध्दांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव अरुण कांबळे, प्रा. रामचंद्र घुले, सागर मलगुंडे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात बजरंग गावडे यांनी ‘स्मशानातून स्मशानाकडे जाताना अखेर निराशा झाली, प्रेतासमोर शितोंडी धरताना परकी सारी आपली झाली’ ही कविता सादर केली. डॉ. मीनाक्षी नांगरे, रवी बावडेकर, भानुदास आंबी, सुधीर बंडगर, राजेंद्र शिंदे, विजय जाधव, पी. व्ही. मुळे, चंद्रकांत कणेरे, रामचंद्र गलांडे यांनीही कविता सादर केल्या.यावेळी नगरसेवक अमित ओसवाल, प्रा. डॉ. जयवंत खरात, पोपट कोळेकर, सागर चव्हाण, अशोक पाटील, प्रा. अरुण घोडके, निरंजन पाटील, वैभव खोत, विकास वाघमोडे, विवेक तांदळे, विनोद राठोड, आकाश कुचीवाले, विवेक जगताप, ऋषिकेश पाटील उपस्थित होते. मानसिंग ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले.