शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : जगाला शांततेचा संदेश देत असताना, अंधश्रध्दा नाहीशी व्हावी आणि मानव निसर्गवादी बनावा, निर्भीड बनावा यासाठी भगवान गौतम बुध्दांनी जगाला अनेक तत्त्वे दिली. निसर्गवादाबरोबर मानवतावादही त्यांनीच दिला. बुध्द विचाराने जगाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी केले.येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्यावतीने गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्त कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आयोजित पहिल्या परिवर्तनवादी कविसंमेलनात ते बोलत होते. स्मशानभूमीत आयोजन होणारे हे पहिलेच कविसंमेलन ठरल्याचे ‘लोकराज्य’चे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. माजी नगरसेवक विजय कुंभार अध्यक्षस्थानी होते. कुंभार म्हणाले की, स्मशानभूमी हे आयुष्याला पूर्णविराम देणारे ठिकाण आहे. मात्र लोकराज्यमुळे स्मशानभूमी परिवर्तनाचे व्यासपीठ बनतील. समाजाने गौतम बुध्दांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव अरुण कांबळे, प्रा. रामचंद्र घुले, सागर मलगुंडे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात बजरंग गावडे यांनी ‘स्मशानातून स्मशानाकडे जाताना अखेर निराशा झाली, प्रेतासमोर शितोंडी धरताना परकी सारी आपली झाली’ ही कविता सादर केली. डॉ. मीनाक्षी नांगरे, रवी बावडेकर, भानुदास आंबी, सुधीर बंडगर, राजेंद्र शिंदे, विजय जाधव, पी. व्ही. मुळे, चंद्रकांत कणेरे, रामचंद्र गलांडे यांनीही कविता सादर केल्या.यावेळी नगरसेवक अमित ओसवाल, प्रा. डॉ. जयवंत खरात, पोपट कोळेकर, सागर चव्हाण, अशोक पाटील, प्रा. अरुण घोडके, निरंजन पाटील, वैभव खोत, विकास वाघमोडे, विवेक तांदळे, विनोद राठोड, आकाश कुचीवाले, विवेक जगताप, ऋषिकेश पाटील उपस्थित होते. मानसिंग ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले.