शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगली महापालिकेच्या ‘स्थायी’ची पहिलीच सभा वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:15 IST

सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील पहिलीच स्थायी समितीची सभा सोमवारी होत आहे. सभेत रिक्षा घंटागाडी खरेदीचा विषय चांगलाच गाजणार आहे. पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला तडा देणारा हा विषय सत्ताधारी भाजपचे सदस्य कशाप्रकारे हाताळतात, यावर भविष्यातील दिशा ठरणार आहे. सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांच्या हाती रिक्षा घंटागाड्या खरेदीच्या विषयाने आयतेच कोलित ...

सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील पहिलीच स्थायी समितीची सभा सोमवारी होत आहे. सभेत रिक्षा घंटागाडी खरेदीचा विषय चांगलाच गाजणार आहे. पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला तडा देणारा हा विषय सत्ताधारी भाजपचे सदस्य कशाप्रकारे हाताळतात, यावर भविष्यातील दिशा ठरणार आहे. सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांच्या हाती रिक्षा घंटागाड्या खरेदीच्या विषयाने आयतेच कोलित मिळाले आहे.महापालिका प्रशासनाने २.८७ कोटी रुपयांना ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत गव्हर्न्मेंट ई मार्केटप्लेस (जीईएम) या पोर्टलवरून रिक्षा घंटागाड्यांची खरेदी केली जाणार आहे. पोर्टलच्या दराने एक रिक्षा घंटागाडी ७ लाख १८ हजारांना मिळणार आहे. स्थानिक डीलरकडे हीच रिक्षा घंटागाडी सर्व करांसह साडेचार लाखांपर्यंत मिळते. एका रिक्षामागे किमान दोन ते अडीच लाखाचा घाटा आहे.त्यात घनकचरा प्रकल्पाच्या स्क्रोल खात्याऐवजी चौदाव्या वित्त आयोगातून २ कोटी ८८ लाख खर्चून या रिक्षा घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव तयार झाला आहे. मात्र प्रत्यक्षात वित्त आयोगाच्या खात्यावर केवळ एक कोटी ४७ लाख रुपयेच शिल्लक आहेत. तसा शेरा मुख्य लेखाधिकाऱ्यांनी मारला आहे. त्यामुळे उर्वरित दीड कोटीची रक्कम कोणत्या खात्यातून वर्ग होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्याबाबत प्रस्तावात कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. एकूणच रिक्षा घंटागाड्या खरेदी वादाच्या भोवºयात सापडली आहे. या विषयामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला भाजपविरोधात आयतेच कोलित मिळाले आहे.आता भाजपने ही खरेदी ई निविदा पद्धतीने करण्याचे जाहीर करून, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. पण स्थायी समितीत काय निर्णय होतो, याकडे मात्र साºयांचेच लक्ष लागले आहे.पोर्टलचे : निकष...पोर्टलच्या निकषानुसार पाच हजार रुपयांपर्यंतच खरेदी असेल तर दरपत्रके, निविदा न मागविता ती खरेदी करावी, असे म्हटले आहे. पण त्याचा दर हा बाजारभावापेक्षा जास्त असू नये. खरेदीचे मूल्य तीन लाखांपेक्षा जास्त नसावे, असे निकष आहेत. शिवाय मोटार वाहने खरेदी ही एक कोटीपेक्षा जास्त असल्यास ती ई- निविदांमार्फत करण्यात यावी. जेणेकरून यातून महापालिकेला स्पर्धात्मक खरेदीतून स्वस्तात गाड्या मिळू शकतील आणि जनतेच्या कराचा पैसा वाचेल, असा उद्देश आहे.