शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांना हवी शाळा, पालकांना ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ...

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपली शाळा कधी सुरू होणार, या बाबतची त्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून त्यांना शाळेतील आपल्या मित्रांबरोबर कधी खेळायला मिळेल, याबाबत त्यांना शाळेची ओढ लागली आहे. दुसरीकडे काेराेनाच्या धास्तीमुळे पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९८ आणि खासगी प्राथमिकच्या सहाशे शाळा आहेत. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक लाख ६९ हजार ४२६ संख्या आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेला गेल्या मार्च २०२० पासून सुट्टी मिळाली असून आजअखेर त्यांच्या शाळेची घंटा वाजलीच नाही. सध्या हे विद्यार्थी शाळेला नव्हे तर घरात थांबायला कंटाळले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी एकदा शाळेत जायची संधी मिळेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आम्ही काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यानंतर त्यांना शाळेत जायचे आहे. पण, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ते नाराज आहेत. पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही आम्ही आमच्या मुलाला या वर्षी शाळेत पाठविणारच नाही, अशाच पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही पालकांनी तर आमच्या मुलांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान झाले तर चालेल, पण आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, यावर काही पालक ठाम आहेत.

मुलांना हवी शाळा...

कोट

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळेत मित्र-मैत्रिणी भेटतात. खेळायलाही मिळते. शिक्षक शिकवतात तेही चांगले समजते. यामुळे ऑनलाईन पेक्षा शाळेतच गेलेले बरे. कोरोना आता कमी झाल्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात.

-शुभम् पाटील, विद्यार्थी चौथी.

कोट

शाळेत खूप मजा येते. मला शाळेला जाण्यास खूप आवडते. पण, कोरोनामुळे शासनाने शाळा बंद केल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. काेरोना कमी झाला असल्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत.

-अवनी उदगीरकर, विद्यार्थिनी तिसरी.

पालकांना चिंता...

कोट

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असे वाटत असले तरीही कोरोनाचे संकट पूर्ण संपले नाही. यामुळे या शैक्षणिक वर्षात माझ्या मुलीला मी शाळेत पाठविणार नाही. शाळा ऑनलाईन खूप चांगल्या पध्दतीने अभ्यास आणि परीक्षाही घेत आहे. यामुळे तेच शिक्षण या वर्षासाठी पुरेसे आहे.

-रंजीता पाटील, पालक.

कोट

दोन महिन्यासाठी पहिली ते पाचवीचे वर्ग शासनाने सुरू करू नयेत. ऑनलाईनच शिक्षण चालू ठेवावे. लहान मुले असल्यामुळे शाळेत कोरोनाबाबत दक्षता घेतली जाईल, याची खात्री नाही. यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची गडबड करू नये.

-प्रभाकर कुलकर्णी, पालक.

चौकट

जिल्ह्यात शाळांची संख्या : २३४९

पहिली ते चाैथी : १६९४२६