शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांना हवी शाळा, पालकांना ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ...

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपली शाळा कधी सुरू होणार, या बाबतची त्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून त्यांना शाळेतील आपल्या मित्रांबरोबर कधी खेळायला मिळेल, याबाबत त्यांना शाळेची ओढ लागली आहे. दुसरीकडे काेराेनाच्या धास्तीमुळे पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९८ आणि खासगी प्राथमिकच्या सहाशे शाळा आहेत. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक लाख ६९ हजार ४२६ संख्या आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेला गेल्या मार्च २०२० पासून सुट्टी मिळाली असून आजअखेर त्यांच्या शाळेची घंटा वाजलीच नाही. सध्या हे विद्यार्थी शाळेला नव्हे तर घरात थांबायला कंटाळले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी एकदा शाळेत जायची संधी मिळेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आम्ही काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यानंतर त्यांना शाळेत जायचे आहे. पण, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ते नाराज आहेत. पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही आम्ही आमच्या मुलाला या वर्षी शाळेत पाठविणारच नाही, अशाच पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही पालकांनी तर आमच्या मुलांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान झाले तर चालेल, पण आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, यावर काही पालक ठाम आहेत.

मुलांना हवी शाळा...

कोट

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळेत मित्र-मैत्रिणी भेटतात. खेळायलाही मिळते. शिक्षक शिकवतात तेही चांगले समजते. यामुळे ऑनलाईन पेक्षा शाळेतच गेलेले बरे. कोरोना आता कमी झाल्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात.

-शुभम् पाटील, विद्यार्थी चौथी.

कोट

शाळेत खूप मजा येते. मला शाळेला जाण्यास खूप आवडते. पण, कोरोनामुळे शासनाने शाळा बंद केल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. काेरोना कमी झाला असल्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत.

-अवनी उदगीरकर, विद्यार्थिनी तिसरी.

पालकांना चिंता...

कोट

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असे वाटत असले तरीही कोरोनाचे संकट पूर्ण संपले नाही. यामुळे या शैक्षणिक वर्षात माझ्या मुलीला मी शाळेत पाठविणार नाही. शाळा ऑनलाईन खूप चांगल्या पध्दतीने अभ्यास आणि परीक्षाही घेत आहे. यामुळे तेच शिक्षण या वर्षासाठी पुरेसे आहे.

-रंजीता पाटील, पालक.

कोट

दोन महिन्यासाठी पहिली ते पाचवीचे वर्ग शासनाने सुरू करू नयेत. ऑनलाईनच शिक्षण चालू ठेवावे. लहान मुले असल्यामुळे शाळेत कोरोनाबाबत दक्षता घेतली जाईल, याची खात्री नाही. यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची गडबड करू नये.

-प्रभाकर कुलकर्णी, पालक.

चौकट

जिल्ह्यात शाळांची संख्या : २३४९

पहिली ते चाैथी : १६९४२६