शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांना हवी शाळा, पालकांना ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ...

सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपली शाळा कधी सुरू होणार, या बाबतची त्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून त्यांना शाळेतील आपल्या मित्रांबरोबर कधी खेळायला मिळेल, याबाबत त्यांना शाळेची ओढ लागली आहे. दुसरीकडे काेराेनाच्या धास्तीमुळे पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९८ आणि खासगी प्राथमिकच्या सहाशे शाळा आहेत. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक लाख ६९ हजार ४२६ संख्या आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेला गेल्या मार्च २०२० पासून सुट्टी मिळाली असून आजअखेर त्यांच्या शाळेची घंटा वाजलीच नाही. सध्या हे विद्यार्थी शाळेला नव्हे तर घरात थांबायला कंटाळले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी एकदा शाळेत जायची संधी मिळेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आम्ही काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यानंतर त्यांना शाळेत जायचे आहे. पण, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ते नाराज आहेत. पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही आम्ही आमच्या मुलाला या वर्षी शाळेत पाठविणारच नाही, अशाच पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही पालकांनी तर आमच्या मुलांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान झाले तर चालेल, पण आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, यावर काही पालक ठाम आहेत.

मुलांना हवी शाळा...

कोट

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळेत मित्र-मैत्रिणी भेटतात. खेळायलाही मिळते. शिक्षक शिकवतात तेही चांगले समजते. यामुळे ऑनलाईन पेक्षा शाळेतच गेलेले बरे. कोरोना आता कमी झाल्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात.

-शुभम् पाटील, विद्यार्थी चौथी.

कोट

शाळेत खूप मजा येते. मला शाळेला जाण्यास खूप आवडते. पण, कोरोनामुळे शासनाने शाळा बंद केल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. काेरोना कमी झाला असल्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत.

-अवनी उदगीरकर, विद्यार्थिनी तिसरी.

पालकांना चिंता...

कोट

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असे वाटत असले तरीही कोरोनाचे संकट पूर्ण संपले नाही. यामुळे या शैक्षणिक वर्षात माझ्या मुलीला मी शाळेत पाठविणार नाही. शाळा ऑनलाईन खूप चांगल्या पध्दतीने अभ्यास आणि परीक्षाही घेत आहे. यामुळे तेच शिक्षण या वर्षासाठी पुरेसे आहे.

-रंजीता पाटील, पालक.

कोट

दोन महिन्यासाठी पहिली ते पाचवीचे वर्ग शासनाने सुरू करू नयेत. ऑनलाईनच शिक्षण चालू ठेवावे. लहान मुले असल्यामुळे शाळेत कोरोनाबाबत दक्षता घेतली जाईल, याची खात्री नाही. यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची गडबड करू नये.

-प्रभाकर कुलकर्णी, पालक.

चौकट

जिल्ह्यात शाळांची संख्या : २३४९

पहिली ते चाैथी : १६९४२६