शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

कऱ्हाड तील एक हजार रिक्षांमध्ये ‘अग्निशमन’ -लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:02 IST

कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.

सचिन काकडे।कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे. आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कऱ्हाडतील रिक्षा चालकांनीही पुढाकार घेतला असून, गॅस किट असलेल्या तब्बल एक हजार रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.

कऱ्हाड शहरात परवानाधारक तब्बल ५ हजार रिक्षा आहेत. यामध्ये गॅस किट असलेल्या सुमारे दीड हजार रिक्षा आहेत. उन्हाळ्यात गॅस किट असलेल्या रिक्षा या तापण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा रिक्षांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ज्या रिक्षांना अग्निशमक यंत्र असेल, अशा रिक्षांच्या परवान्याचेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नूतनीकरण केले जाते. गॅस किट असलेल्या रिक्षांना अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारण असताना आता स्वत: रिक्षाचालकांनी स्वत:च्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे. जवळपास एक हजार रिक्षा चालकांनी ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे.हाताळण्याचे मार्गदर्शनही घेतले...शहरातील अनेक रिक्षाचालकांनी अग्निशमन यंत्र बसविण्यावर भर दिला आहे. या यंत्राचा कशा प्रकारे वापर करायला हवा, याची माहितीही अनेकांनी जाणून घेतली आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास तातडीचा उपाय म्हणून या अग्निशमन यंत्राची मोठी मदत होणार आहे, अशी माहिती शहरातील काही रिक्षा चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शहरातील हजारो नागरिक रिक्षाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही गॅस किट असलेल्या रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे. भविष्यात आगीसारख्या घटना घटल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.- जालिंदर बुरुड, रिक्षाचालकशहरातील रिक्षा चालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. केवळ गॅस किट असलेल्या रिक्षांनाच नव्हे तर डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांनाही अग्निशमन यंत्र बसविणे अत्यंत गरजेचे आहे.- संतोष पवार, नागरिक