शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

फोटो २६ महेशकुमार कोष्टी फोटो २६ सदानंद कदम फोटो २६ विठ्ठल मोहिते लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या वर्षभरात ...

फोटो २६ महेशकुमार कोष्टी

फोटो २६ सदानंद कदम

फोटो २६ विठ्ठल मोहिते

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या वर्षभरात विद्यार्थी फक्त ऑनलाईन शिक्षण घेताहेत. वही-पेनऐवजी मोबाईलच्या स्क्रीनवर त्यांची बोटे फिरताहेत. याचा परिणाम म्हणून हस्ताक्षरांची लय बिघडली असून लिखाणाची गतीही कमी झाली आहे. शिक्षक आणि काही शिक्षणतज्ज्ञांनी ही चिंतेची बाब समोर आणली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणून ही बाब ठळकपणे समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षण काळात विद्यार्थ्यांना मोजकाच अभ्यास मिळत राहिला. स्वाध्यायदेखील मोबाईलवरच करावे लागले. मोबाईलच्या वापराला मुले सरावली, पण त्याच्या दुष्परिणामांची दुसरी बाजूही समोर आली. त्यांचे लिखाण कमी झाले. वर्गात शिक्षकांकडून लिखाणावर भर दिला जायचा. उत्तरे घोटून घेतली जायची. या सगळ्याला विश्रांती मिळाली. काही मोजकेच लिखाण ऑनलाईनद्वारे दिले गेले, पण घरच्या घरी निवांत लिहिण्याची सोय असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची गती कमी झाली. आता दहावी-बारावीसह विविध वर्गांच्या परीक्षा तोंडावर असताना, पालकांना पाल्यांच्या लिखाणाची चिंता भेडसावू लागली आहे. घरात लिखाणासाठी बेंचसारखी व्यवस्था नसल्यानेही मुलांच्या लेखनशैलीत फरक पडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चाैकट

विद्यार्थ्यांनो हे करा...

- परीक्षेच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा

- हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करा

- घरात पेपर सोडविताना किंवा लिखाण करताना योग्य उंचीच्या टेबल-खुर्चीचा वापर करा

- दिवसभरात किमान आठ-दहा पाने लिखाण करायलाच हवे

- परीक्षा काळात खात्री असलेल्या उत्तरांच्या लेखनाचा सराव करा

मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांबाबत ही समस्या गंभीर आहे. त्यांना प्रत्यक्ष वर्गात असतानाही पुरेसे लिहिता येत नव्हते. ऑनलाईन शिक्षणातही पूर्ण क्षमतेने सहभागी नाहीत, त्यामुळे त्यांचे हस्ताक्षर, लेखनाची गती याबाबतीत चिंतादायक स्थिती आहे. त्यांचा शैक्षणिक पाया ठिसूळ राहण्याचा धोका आहे.

- सदानंद कदम, भाषातज्ज्ञ

वर्गात विद्यार्थ्यांच्या लेखनावर भर देत होते. ऑनलाईनमुळे हे सारे थांबले आहे. शिक्षण विभागाने स्वाध्याय शिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी ते मोबाईलबरोबरच वहीमध्येही लिहून घ्यावे असा आमचा आग्रह असतो. त्याद्वारे लिखाणाची सवय कायम ठेवण्याचा हेतू आहे. हस्ताक्षरांचे वळण मोडू नये यासाठी प्रयत्न आहेत.

- विठ्ठल मोहिते, अध्यक्ष, मराठी अध्यापक संघ

मुले घरात लिखाणाकडे दुर्लक्ष करतात. शिक्षकांचा प्रत्यक्ष दबाव नसल्याने निवांत अभ्यास करतात. अभ्यास भरपूर आहे, पण ऑनलाईनमुळे तो हातातून उतरत नाही. परिणामी मुलांचा लिखाणाचा सराव थांबला आहे. त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जाणवण्याचा धोका आहे.

- अनुजा कुलकर्णी, पालक

मोबाईलमुळे लिखाण थांबल्याचे वेळेत लक्षात आल्याने घरातच लिखाणावर भर दिला. मोबाईलवरचा अभ्यास वहीतदेखील नोंदविण्यावर लक्ष दिले. त्याचा फायदा झाला. स्वच्छ लेखन, गती यांचा सराव कायम राहिला. अन्यथा, मोबाईलमुळे मुलांचे अक्षर बिघडण्याची भीती होती.

- महेशकुमार कोष्टी, पालक