शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीवर नियंत्रणाचे प्रयत्न

By admin | Updated: August 8, 2016 23:37 IST

शेखर गायकवाड : पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज

सांगली : कोयना धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवून पूरस्थिती येणार नाही यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रशासन यंत्रणा कार्यरत असून, येत्या ११ आॅगस्टपासून सुरू होणारा नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा विनाविघ्न पार पडण्यासाठी नदीतील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे झालेल्या बैठकीत, पूरस्थिती येणार नाही यासाठी पाण्याचा विसर्ग करण्याबाबत चर्चा झाली आहे. ११ आॅगस्टपासून नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा सुरू होत असून, या सोहळा कालावधित कृष्णा, वारणा व पंचगंगा या तीनही नद्यांची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणातून १८ हजार १९३ क्युसेक, तर वारणा धरणातून १२ हजार ४२० क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी पाच फुटापर्यंत वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. आयर्विन पूल येथे सध्या ३३.६० फुटावर असलेली पाणीपातळी ३९ फुटावर जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेक विसर्गकर्नाटकातील अलमट्टी धरणातून सध्यात १ लाख ७४ हजार २७५ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पूरस्थिती येणार नाही. तरीही कोयनेतून विसर्ग वाढला, तर पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.