शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

पूरस्थितीवर नियंत्रणाचे प्रयत्न

By admin | Updated: August 8, 2016 23:37 IST

शेखर गायकवाड : पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज

सांगली : कोयना धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवून पूरस्थिती येणार नाही यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रशासन यंत्रणा कार्यरत असून, येत्या ११ आॅगस्टपासून सुरू होणारा नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा विनाविघ्न पार पडण्यासाठी नदीतील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे झालेल्या बैठकीत, पूरस्थिती येणार नाही यासाठी पाण्याचा विसर्ग करण्याबाबत चर्चा झाली आहे. ११ आॅगस्टपासून नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा सुरू होत असून, या सोहळा कालावधित कृष्णा, वारणा व पंचगंगा या तीनही नद्यांची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणातून १८ हजार १९३ क्युसेक, तर वारणा धरणातून १२ हजार ४२० क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी पाच फुटापर्यंत वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. आयर्विन पूल येथे सध्या ३३.६० फुटावर असलेली पाणीपातळी ३९ फुटावर जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेक विसर्गकर्नाटकातील अलमट्टी धरणातून सध्यात १ लाख ७४ हजार २७५ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पूरस्थिती येणार नाही. तरीही कोयनेतून विसर्ग वाढला, तर पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.