शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जत पालिका आर्थिक अडचणीत

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

दैनंदिन विकाससाठी दरमहा सरासरी दहा लाख रुपये खर्च परंतु प्रत्यक्षात चार ते पाच लाख रुपये वसुली

जयवंत अदाटे - जत सध्या जत नगरपालिकेची थकबाकी पाच कोटी रुपये इतकी आहे. दैनंदिन विकास कामांसाठी दरमहा सरासरी दहा लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. परंतु प्रत्यक्षात चार ते पाच लाख रुपये दरमहा वसुली आहे. उर्वरित खर्चाचा ताळमेळ घालताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवसेंदिवस जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडत चालल्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आहे.घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर मिळून नगरपालिकेची सुमारे पाच कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. गौसिध्द तलाव, यल्लम्मादेवी विहीर व बिरनाळ साठवण तलाव येथील पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल, कर्मचारी पगार व इतर बाबींवर नगरपालिकेला दरमहा सुमारे सहा लाख रुपये खर्च करावे लागतात. प्रत्यक्षात पालिकेला सध्या चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असल्याने पालिकेची आर्थिक घडी विस्कळीत होऊ लागली आहे.पाणीपुरवठा वीज बिलापोटी नगरपालिका वीज कंपनीचे लाखो रुपये देणे लागत आहे. दिवसेंदिवस या थकबाकीत भर पडत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे मासिक पगार देण्यासाठी पालिकेत दरमहा पैसे शिल्लक नसतात. थकबाकीदारांच्या घराकडे हेलपाटे मारुन त्यांना विनंती करून थकबाकी वसूल करून कर्मचाऱ्यांचा पगार कसा तरी केला जात आहे. परंतु विकास कामांना मात्र खीळ बसत आहे.घरजागेची नोंदणी घालताना उतारा व इतर दाखले देताना नगरपालिका प्रशासनाला थकबाकी वसूल करून घेता येणार आहे, परंतु काही नगरसेवक सोयीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे थकबाकी वसूल करून उतारा देताना कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव येत आहे. प्रतिवर्षी सरासरी ४५ टक्के वसुली आवश्यक आहे. परंतु २0१३-१४ या आर्थिक वर्षात पालिकेची वसुली फक्त २८ टक्के इतकीच झाली आहे. कमी वसुली असेल तर जिल्हाधिकारी काम समाधानकारक नाही म्हणून पालिका बरखास्त करू शकतात, असा नियम आहे. यासंदर्भात आता जनजागृती होऊ लागली आहे. जत शहर आणि उपनगरात सुमारे नऊ हजार घरगुती वीज कनेक्शन्स असली तरी फक्त काही कनेक्शन्सची नोंद पालिकेकडे आहे. उर्वरित कनेक्शन्स बोगस आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु या बोगस नळ कनेक्शन धारकांवर आजपर्यंत कोणतीच कारवाई केली जात नाही. यातून प्रतिवर्षी लाखो रुपयांचे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या प्रमाणात घरगुती वीज कनेक्शन आहेत, त्या प्रमाणात नळ कनेक्शन्स असणे आवश्यक असले तरी, याकडे पालिका प्रशासन आणि नगरसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप होत आहे.उपाययोजनांचा दावा...थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जन्म, मृत्यू दाखला वगळता इतर कोणतेही दाखले आणि घरजागेचा उतारा थकबाकीदारांना दिला जाणार नाही. वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी दररोज सरासरी पंचवीस हजार रुपये वसुली करणे आवश्यक आहे, असा नियम केला आहे. ज्या दिवशी वसुली नसेल त्या दिवशी कर्मचारी गैरहजर, अशी नोंद हजेरी पुस्तकात घेऊन त्यांचा पगार कपात केला जाणार आहे. थकबाकी असणाऱ्यांचे काम पालिका प्रशासन करणार नाही. यासंदर्भात सर्वच नगरसेवकांना सूचना करण्यात आली आहे, असे नगराध्यक्ष रवींद्र साळे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.