शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा ...

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा विचार पाच-सात वर्षांपासून सुरू असतो, तर काही चित्रपटांचे विचार लगेचच प्रत्यक्षात अवतरतात. चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार खूप खर्चिक व आव्हानात्मक असल्याने अवतीभोवती काय चालले आहे, याचे भान आवश्यक आहे. त्यामुळेच समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित पहिल्या अशियाई चित्रपट महोत्सवाचा समोराप रविवारी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी ‘चित्रपट निर्मिती, त्यातील आव्हाने’ यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ५० व्या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी त्यांच्यासमवेत घेतला.ते म्हणाले, पूर्वीपासून दिग्दर्शकच व्हायचे ठरविले होते. तरीही मनापासून कविता लिहिण्याची आवड होती. कवी असाल तर सर्व काही साध्य होते. थेट काळजातून आलेली गोष्ट कवितेतून मांडता येते. याच कवितेतील भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी झालो. उठलो आणि दिग्दर्शन केले, असे कधीही होत नाही. हा कलाप्रकारच खूप खर्चिक असल्याने सुरुवातीला सिनेमा समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यातूनच सिनेमा कसा करू नये, हेही शिकलो आणि सिनेमा कसा करावा हे लक्षात आले.चित्रपट दिग्दर्शनातील अनुभवाबाबत ते म्हणाले, आयुष्यात कोणताही एकच अनुभव समृध्द करतो, असे कधीही होत नाही. ज्वलंत जीवनानुभव महत्त्वाचे ठरतात. चित्रपट हा एकमताने करायचा कलाप्रकार आहे. हे टीमवर्क असले तरी त्यात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असायला हवी. अगदी स्पॉटबॉईजपासून प्रत्येकाचे दृष्टिकोन असतात; पण योग्य दृष्टिकोन फक्त दिग्दर्शकालाच माहीत असतात.सांगली फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चित्रपट निर्मिती... आव्हानात्मक कामअहिरे म्हणाले, चित्रपट निर्मिती हा व्यावसायिक कलाप्रकार असल्याने त्यात करोडो रुपये गुंतविलेले असतात. त्यावर अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे मार्केट काय आहे, अवतीभोवती काय चालले आहे, आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि ते चित्रपटातून कशाप्रकारे सांगता आहात, तेही योग्य पात्रांच्या निवडीतून, हेच आव्हानात्मक काम आहे.