शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा ...

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा विचार पाच-सात वर्षांपासून सुरू असतो, तर काही चित्रपटांचे विचार लगेचच प्रत्यक्षात अवतरतात. चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार खूप खर्चिक व आव्हानात्मक असल्याने अवतीभोवती काय चालले आहे, याचे भान आवश्यक आहे. त्यामुळेच समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित पहिल्या अशियाई चित्रपट महोत्सवाचा समोराप रविवारी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी ‘चित्रपट निर्मिती, त्यातील आव्हाने’ यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ५० व्या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी त्यांच्यासमवेत घेतला.ते म्हणाले, पूर्वीपासून दिग्दर्शकच व्हायचे ठरविले होते. तरीही मनापासून कविता लिहिण्याची आवड होती. कवी असाल तर सर्व काही साध्य होते. थेट काळजातून आलेली गोष्ट कवितेतून मांडता येते. याच कवितेतील भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी झालो. उठलो आणि दिग्दर्शन केले, असे कधीही होत नाही. हा कलाप्रकारच खूप खर्चिक असल्याने सुरुवातीला सिनेमा समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यातूनच सिनेमा कसा करू नये, हेही शिकलो आणि सिनेमा कसा करावा हे लक्षात आले.चित्रपट दिग्दर्शनातील अनुभवाबाबत ते म्हणाले, आयुष्यात कोणताही एकच अनुभव समृध्द करतो, असे कधीही होत नाही. ज्वलंत जीवनानुभव महत्त्वाचे ठरतात. चित्रपट हा एकमताने करायचा कलाप्रकार आहे. हे टीमवर्क असले तरी त्यात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असायला हवी. अगदी स्पॉटबॉईजपासून प्रत्येकाचे दृष्टिकोन असतात; पण योग्य दृष्टिकोन फक्त दिग्दर्शकालाच माहीत असतात.सांगली फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चित्रपट निर्मिती... आव्हानात्मक कामअहिरे म्हणाले, चित्रपट निर्मिती हा व्यावसायिक कलाप्रकार असल्याने त्यात करोडो रुपये गुंतविलेले असतात. त्यावर अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे मार्केट काय आहे, अवतीभोवती काय चालले आहे, आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि ते चित्रपटातून कशाप्रकारे सांगता आहात, तेही योग्य पात्रांच्या निवडीतून, हेच आव्हानात्मक काम आहे.