शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा ...

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा विचार पाच-सात वर्षांपासून सुरू असतो, तर काही चित्रपटांचे विचार लगेचच प्रत्यक्षात अवतरतात. चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार खूप खर्चिक व आव्हानात्मक असल्याने अवतीभोवती काय चालले आहे, याचे भान आवश्यक आहे. त्यामुळेच समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित पहिल्या अशियाई चित्रपट महोत्सवाचा समोराप रविवारी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी ‘चित्रपट निर्मिती, त्यातील आव्हाने’ यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ५० व्या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी त्यांच्यासमवेत घेतला.ते म्हणाले, पूर्वीपासून दिग्दर्शकच व्हायचे ठरविले होते. तरीही मनापासून कविता लिहिण्याची आवड होती. कवी असाल तर सर्व काही साध्य होते. थेट काळजातून आलेली गोष्ट कवितेतून मांडता येते. याच कवितेतील भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी झालो. उठलो आणि दिग्दर्शन केले, असे कधीही होत नाही. हा कलाप्रकारच खूप खर्चिक असल्याने सुरुवातीला सिनेमा समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यातूनच सिनेमा कसा करू नये, हेही शिकलो आणि सिनेमा कसा करावा हे लक्षात आले.चित्रपट दिग्दर्शनातील अनुभवाबाबत ते म्हणाले, आयुष्यात कोणताही एकच अनुभव समृध्द करतो, असे कधीही होत नाही. ज्वलंत जीवनानुभव महत्त्वाचे ठरतात. चित्रपट हा एकमताने करायचा कलाप्रकार आहे. हे टीमवर्क असले तरी त्यात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असायला हवी. अगदी स्पॉटबॉईजपासून प्रत्येकाचे दृष्टिकोन असतात; पण योग्य दृष्टिकोन फक्त दिग्दर्शकालाच माहीत असतात.सांगली फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चित्रपट निर्मिती... आव्हानात्मक कामअहिरे म्हणाले, चित्रपट निर्मिती हा व्यावसायिक कलाप्रकार असल्याने त्यात करोडो रुपये गुंतविलेले असतात. त्यावर अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे मार्केट काय आहे, अवतीभोवती काय चालले आहे, आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि ते चित्रपटातून कशाप्रकारे सांगता आहात, तेही योग्य पात्रांच्या निवडीतून, हेच आव्हानात्मक काम आहे.