शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटी भरा, मगच म्हैसाळचे पाणी

By admin | Updated: January 17, 2016 00:37 IST

विजय शिवतारे : टंचाई निधीतून पाणी सोडण्यास नकार

 मिरज : म्हैसाळ, ताकारी सिंचन योजनांच्या जुन्या ३५ कोटींच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देऊ. मात्र, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी महिन्याला पाच कोटी रुपये आगाऊ पाणी बिल भरलेच पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. म्हैसाळ, ताकारीबाबत शनिवारी मिरजेत झालेल्या आढावा बैठकीत टंचाई निधीतून पाणी सोडण्याच्या आ. जयंत पाटील यांच्या मागणीस मंत्री शिवतारे यांनी नकार दिला. ताकारी, म्हैसाळ योजनांसंदर्भात मिरजेत आयोजित बैठकीस आ. जयंत पाटील, आ. सुमन पाटील, आ. सुरेश खाडे, आ. अनिल बाबर, आ. शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ताकारी योजनेचे पाणी बिल जमा आहे. मात्र, म्हैसाळ योजनेचे १४ कोटी वीज बिल थकीत असल्याने आवर्तन सुरू झालेले नाही. यापूर्वी टंचाई निधीतून म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सद्य:स्थितीत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली. त्यावर मंत्री शिवतारे म्हणाले की, म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतक ऱ्यांनी वापरलेल्या पाण्याचीच आहे. आता सद्य:स्थितीत जुन्या थकबाकी वसुलीला तात्पुरती स्थगिती देऊ. मात्र, म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी दरमहा पाच कोटी आगाऊ भरणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच कोटी रुपये भरावेत. ही रक्कम जुन्या थकबाकीपोटी वसूल केली जाणार नाही. टंचाई परिस्थितीमुळे एप्रिल व आॅगस्ट महिन्यात ‘म्हैसाळ’ची दोन आवर्तने सुरू केली. मात्र, त्यांच्याही बिलाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे वीज बिल व देखभाल खर्चाएवढे पैसे भरा, नंतरच म्हैसाळचे पाणी सोडता येईल, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर) थकबाकी वापरलेल्या पाण्याची आमच्या काळात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘पाणी योजनांची थकबाकी तुमच्याच काळातील आहे. टंचाई काळात सोडलेल्या पाण्याची नव्हे, तर टंचाई नसताना वापरलेल्या पाण्याची थकबाकी भरावी लागेल’, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले.