शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:17 IST

‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीकडे राज्य शासनाकडून वर्षाला सुमारे २२० कोटींचा निधी मिळत असल्यामुळे समितीवर जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असून, समितीच्या २७ रिक्त जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या मतदारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या विकास कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी येतो. राज्य शासनाकडून गेल्यावर्षी सुमारे २२० कोटींवर निधी आला आहे. आमदार, खासदारांचा फंडही जिल्हा नियोजन समितीकडेच येतो. त्यातून नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका आणि जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधी दिला जातो. सर्वाधिक निधी जिल्हा परिषदेकडे दिला जात असून, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६० असली तरी, त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर सर्वाधिक सदस्य जिल्हा परिषद सदस्यांतून निवडून दिले जातात. जिल्हा नियोजन समितीत एकूण ४५ सदस्यसंख्या असून, त्यापैकी ११ स्वीकृत सदस्यांची निवड आमदार, खासदारांच्या शिफारशीने राज्य शासन करते. दोन नामनिर्देशित सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री सुभाष देशमुख असून, जिल्हाधिकारी सचिव आहेत.जिल्ह्यात सहा नगरपालिका असून, त्यांचे १३४ मतदार आहेत. या गटातून तीन सदस्य निवडून दिले जाणार आहे. चार नगरपंचायती असून, त्यांचे ६८ मतदार आहेत. या गटातून केवळ एकच सदस्य निवडून दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेत मतदारांची संख्या ६० असून, तेथून २३ सदस्य निवडून दिले जातील. जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी ज्या सदस्यांना पदे दिले नाहीत, त्यांना जिल्हा नियोजन समितीवर निवडून देण्याचे धोरण ठरविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या सदस्यांनाही प्रतिनिधीत्व द्यावे लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. सदस्य निवडताना भाजपमधील नेत्यांचे मनोमीलन होणार, की नाराजीनाट्य आणखी रंगणार, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नगरपालिका गट तीन, नगरपंचायत एक आणि जिल्हा परिषदेतून २३ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या जागांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित जागा शासननियुक्त आहेत. एकूणच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आता राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. संजयसिंह चव्हाण यांच्याकडे जबाबदारी निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. निवडणुकीची सर्व जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मतदारांची यादी हरकतीसाठी सोमवार, दि. १७ रोजी प्रसिध्द केली. या हरकतींची मुदत दि. १९ रोजी संपली असून, दोन दिवसात मतदार यादी अंतिम होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार आहे.मतदान : की बिनविरोध?जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बहुतांशवेळा बिनविरोधच झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आजपर्यंत वर्चस्व होते. परंतु, यावर्षी प्रथमच भाजपने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आहे. इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही भाजपचे नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामुळे यावेळी भाजपचे वर्चस्व राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी समझोता करून भाजपने बिनविरोधचा प्रस्ताव दिला तरच, निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपच्या अंतर्गत कलहावरही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार, हे ठरणार आहे.