शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
2
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
3
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
4
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
5
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
6
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
7
Pitru Paksha 2025: पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
8
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
9
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
10
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
11
"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा
12
VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?
13
पितृपक्ष २०२५: पितरांना नैवेद्य दाखवल्यावर आवर्जून म्हणा 'हे' स्तोत्र; अन्यथा अपूर्ण राहील श्राद्ध विधी!
14
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
15
Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?
16
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
17
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
18
Pitru Paksha 2025: पितृ ऋण कशाला म्हणतात, पितृ पक्षात ते का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!
19
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
20
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

आष्ट्यात रस्ता वहिवाटीच्या कारणावरून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:24 IST

आष्टा : येथील खोत मळा अमृतवाडी येथील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून वर्षा शिवाजी पाटील या वकील महिलेसह रवींद्र जालिंदर चोरमुले ...

आष्टा : येथील खोत मळा अमृतवाडी येथील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून वर्षा शिवाजी पाटील या वकील महिलेसह रवींद्र जालिंदर चोरमुले (दोघे, रा. आष्टा) यांनी आष्टा पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रवींद्र जालिंदर चोरमुले (वय ३०) व बाळासाहेब किसन शेळके (५४), शिवाजी बापूसाहेब पाटील (४९) व धीरज रामचंद्र पाटील (२०) यांना आष्टा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींना इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना बुधवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

खोत मळा अमृतवाडी येथील शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून पाटील व चोरमुले कुटुंबीयांत वाद सुरू आहे. या वादातूनच शनिवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान तलवार, काठ्या, कोयता, कुदळीच्या दांड्याने जालिंदर चोरमुले, रवींद्र चोरमुले, कौशल्‍या चोरमुले, ज्योती चोरमुले, मंगल नरूटे, अंकुश चोरमुले, बाळासाहेब शेळके यांची दोन मुले संग्राम व किरण यांच्यासह २५ लोकांनी मारहाण केल्याची फिर्याद वर्षा शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

तर रवींद्र चोरमुले यांनी दिलेल्या फिर्यादीत शिवाजी पाटील, तानाजी पाटील, धीरज पाटील ,संभाजी पाटील, राजाक्का पाटील, वर्षा पाटील, शुभांगी पाटील, धनश्री पाटील, कल्पना पाटील (सर्व, रा. खोत मळा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कुऱ्हाड व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद्ध करीत आहे.