शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

सांगली : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेमुळे नदी प्रदूषण, राखेचे प्रदूषण, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, सावळीजवळील कारखान्यांकडून होणारे प्रदूषण... असे ...

सांगली : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेमुळे नदी प्रदूषण, राखेचे प्रदूषण, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, सावळीजवळील कारखान्यांकडून होणारे प्रदूषण... असे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर भारतीय दंडविधान संहिता कलम १६६ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. शिंदे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणामुळे कोंबड्यांचा, पक्ष्यांचा मृत्यू, साखर कारखान्यांमुळे होणारे जमीन, पाण्याचे, राखेमुळे होणारे हवेचे प्रदूषण, नदीचे होणारे प्रदूषण, नैसर्गिक नाल्यांचे होणारे प्रदूषण, घनकचऱ्यामुळे होणारे प्रदूषण, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जिल्ह्याची कधीही भरून न येणारी अशी नैसर्गिक हानी होत आहे. कर्कराेगासारखे अनेक दुर्धर आजार या प्रदूषणांमुळे वाढतच चालले आहेत. परंतु जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सध्याचे उपप्रादेशिक अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयातील सध्याचे प्रादेशिक अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाहीत.

सांगली जिल्हा सुधार समितीने यापूर्वी जिल्ह्यातील विविध प्रदूषण विषयांवर सांगली आणि वरिष्ठ कार्यालयाकडे असंख्य तक्रारी केलेल्या आहेत, मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी केवळ नोटिसा देण्यासारख्या जुजबी कारवाया केल्या. या कारवाईला संबंधितांनी केराची टोपली दाखवली आहे. अनेकदा अधिकाऱ्यांची मिलीभगत होऊन कारवाईस टाळाटाळ केलेली आहे. सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या की, त्यांना अनेक दिवस ताटकळत ठेवून केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम ते करीत आहेत.

त्यामुळे हे अधिकारीच या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना बडतर्फ करून त्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी जयंत जाधव, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, दाऊद मुजावर, अभिषेक खोत उपस्थित होते.