शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी ...

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आक्कळवाडी (ता. जत) ग्रामपंचायतीने २४ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले नाही, तर त्यांच्याकडून १४ लाख ९० हजार रुपये वसूल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जत तालुक्यातील रखडलेल्या ४८ पाणी पुरवठा योजनांच्या कामासंदर्भात जत येथे बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, कार्यकारी अभियंता डी. जे. सोनवणे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, उपअभियंता उदय देशपांडे, तहसीलदार सचिन पाटील व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.

रामपूर मल्लाळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना २००८-०९ मध्ये पूर्ण केली आहे. या योजनेच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या होत्या. त्याची कागदपत्रे प्रशासनाने मागणी करूनही त्यांनी सादर केली नाहीत. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

आक्कळवाडी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ डिसेंबर २०२० अखेर काम पूर्ण केले नाही, तर १४ लाख ९० हजार रुपयांची वसुली करावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

अचकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. बी. चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केली, म्हणून त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात याव्यात, असा आदेश या आढावा बैठकीत देण्यात आला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायतीचे बहुतांश सरपंच अनुपस्थित होते. त्यांचे दप्तर तपासून, दोष आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

चौकट

तालुक्यात खळबळ

तालुक्यात अपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, ग्रामसेवक, टीएसपी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत व खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.