शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी ...

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आक्कळवाडी (ता. जत) ग्रामपंचायतीने २४ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले नाही, तर त्यांच्याकडून १४ लाख ९० हजार रुपये वसूल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जत तालुक्यातील रखडलेल्या ४८ पाणी पुरवठा योजनांच्या कामासंदर्भात जत येथे बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, कार्यकारी अभियंता डी. जे. सोनवणे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, उपअभियंता उदय देशपांडे, तहसीलदार सचिन पाटील व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.

रामपूर मल्लाळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना २००८-०९ मध्ये पूर्ण केली आहे. या योजनेच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या होत्या. त्याची कागदपत्रे प्रशासनाने मागणी करूनही त्यांनी सादर केली नाहीत. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

आक्कळवाडी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ डिसेंबर २०२० अखेर काम पूर्ण केले नाही, तर १४ लाख ९० हजार रुपयांची वसुली करावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

अचकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. बी. चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केली, म्हणून त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात याव्यात, असा आदेश या आढावा बैठकीत देण्यात आला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायतीचे बहुतांश सरपंच अनुपस्थित होते. त्यांचे दप्तर तपासून, दोष आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

चौकट

तालुक्यात खळबळ

तालुक्यात अपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, ग्रामसेवक, टीएसपी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत व खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.