शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी ...

जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आक्कळवाडी (ता. जत) ग्रामपंचायतीने २४ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले नाही, तर त्यांच्याकडून १४ लाख ९० हजार रुपये वसूल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जत तालुक्यातील रखडलेल्या ४८ पाणी पुरवठा योजनांच्या कामासंदर्भात जत येथे बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, कार्यकारी अभियंता डी. जे. सोनवणे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, उपअभियंता उदय देशपांडे, तहसीलदार सचिन पाटील व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.

रामपूर मल्लाळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना २००८-०९ मध्ये पूर्ण केली आहे. या योजनेच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या होत्या. त्याची कागदपत्रे प्रशासनाने मागणी करूनही त्यांनी सादर केली नाहीत. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

आक्कळवाडी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ डिसेंबर २०२० अखेर काम पूर्ण केले नाही, तर १४ लाख ९० हजार रुपयांची वसुली करावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

अचकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. बी. चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केली, म्हणून त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात याव्यात, असा आदेश या आढावा बैठकीत देण्यात आला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायतीचे बहुतांश सरपंच अनुपस्थित होते. त्यांचे दप्तर तपासून, दोष आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.

चौकट

तालुक्यात खळबळ

तालुक्यात अपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, ग्रामसेवक, टीएसपी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत व खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.