शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगलीत कुळाला हाकलण्यावरून मारामारी

By admin | Updated: June 2, 2016 01:12 IST

माळी गल्लीतील घटना : दोघेजण जखमी, चारजणांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल

सांगली : शहरातील माळी गल्लीत बुधवारी कुळजागेच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत सुनील रघुनाथ बाबर (वय ४५) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चारजणांविरोधात फिर्याद दाखल केली असून, रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. माळी गल्लीत सुनील बाबर, दत्ता मोहिते, बाळासाहेब सदावरे, सरस्वती कुंभार, शिवाजी धोत्रे ही पाच कुटुंबे गेल्या दोन पिढ्यांपासून राजाराम माळी यांच्या मालकीच्या जागेत भाड्याने रहात आहेत. राजाराम माळी यांनी ही जागा मनोज माळी याला विकली होती. त्यानंतर मनोज माळी त्यांनी ती श्रीकृष्ण माळी यांना विकली. या जागेवर अनेक वर्षापासून काही कुटुंबे राहात आहेत. या कुटुंबांनी जागा सोडावी, यासाठी माळी यांचे प्रयत्न सुरू होते, मात्र भाडेकरू याला दाद देत नव्हते. यासंदर्भात सर्व भाडेकरूंनी तीन महिन्यांपूर्वी सांगलीच्या न्यायालयात कुळ कायद्याखाली संबंधित जागेवर दावा दाखल केला आहे. या भाडेकरूंच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. भाडेकरूंपैकी शिवाजी धोत्रे व सरस्वती कुंभार यांची घरे धोकादायक बनली होती. महापालिकेनेही ही घरे धोकादायक ठरवून त्यांना बांधकाम उतरविण्याबाबत नोटीसही बजाविली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथक संबंधित धोकादायक इमारत पाडण्यासाठी माळी गल्लीत दाखल झाले. बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही आणण्यात आला होता. घराचा धोकादायक काही भाग पाडून महापालिकेचे पथक पोलिसांसह माघारी फिरले. त्यानंतर श्रीकृष्ण माळी, त्याचा भाऊ श्रीहरी, श्रीराम व त्यांचा कामगार सागर राजाराम माळी हे चौघे माळीगल्लीत आले. त्यांनी भाडेकरूंची घरे जेसीबीने पाडूया, कोण काय करतेय बघू, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी माळी यांना सागर बाबर याने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्रीकृष्ण माळी याने हातात दगड घेऊन बाबर यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याखाली मोठी इजा झाली आहे. त्याचवेळी श्रीराम माळी हे भाडेकरूंच्या घरावर चढून छतावरील लाकडे उपसून काढून टाकू लागले. यावेळी शेजारी राहणारे राजू बापू कोकाटे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने हातातील बांबू राजू यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. राजू यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई व इतर भाडेकरू धावून आले. त्यांनाही धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे माळी गल्लीत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर येथील भाडेकरूंनी थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. सागर बाबर यांनी श्रीकृष्ण माळी, श्रीराम माळी, श्रीहरी माळी व सागर माळी या चौघांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे. (प्रतिनिधी) महापालिका इतकी तत्पर कशी? माळी गल्लीतील शिवाजी धोत्रे व सरस्वती कुंभार या भाडेकरूंची घरे धोकादायक बनली होती. या घराबाबत मूळ मालकाला महापालिकेने नोटीसही बजाविली होती. शहरातील अनेक जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. खुद्द महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. आजअखेर अशा धोकादायक इमारतींना केवळ नोटिसा देण्याचे काम पालिकेने केले आहे. फारच दबाव असेल, तर एखादी कारवाई केली जाते. माळी गल्लीतील घरांबाबत मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. धोकादायक घरे पाडण्यासाठी कधी पोलिस बंदोबस्त घेण्यात आला नव्हता, पण इथे मात्र मोठा फौजफाटा होता. त्यामुळे या नागरिक महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करीत होते.