शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप अखेर सुरू

By admin | Updated: August 26, 2015 00:26 IST

शेतकऱ्यांना दिलासा : मिरज, कवठेमहांकाळ, जतला फायदा

मिरज : म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप मंगळवारी सुरू करण्यात आले. खा. संजय पाटील यांनी कळ दाबून पंप सुरू केले. अवर्षणामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असताना म्हैसाळचे पाणी सोडण्यात आल्याने मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आॅगस्टअखेरपर्यंत पाऊस न पडल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिलाची तरतूद करून पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खा. संजय पाटील यांनी मंगळवारी म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले. ताकारी व टेंभू योजना चांगल्या पद्धतीने सुरूआहे. त्याच पद्धतीने म्हैसाळ योजना चालविण्याची जबाबदारी या परिसरातील साखर कारखाने व मोठ्या शेतकऱ्यांनी घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचा द्राक्षबागायतदारांना मोठा फायदा झाला आहे. मात्र तरीही वीजबिलाएवढी रक्कम जमा होत नाही. जिल्ह्यातील इतर दोन योजना सुरू असताना म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावे लागतात. म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले नाही, तर ही योजना बंद पडेल, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, दीपक शिंदे, पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, गंगाधर तोडकर, कुमार नाईक, मिरजेचे प्रांत हेमंत निकम, म्हैसाळचे उपअभियंता सूर्यकांत नलवडे उपस्थित होते. म्हैसाळचे पहिल्या टप्प्यातील १५ पंप सुरू करण्यात आले असून, दोन महिने जतपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील गावात पिण्यासाठी व शेतीसाठी म्हैसाळच्या पाण्याचा फायदा मिळणार आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणार असून, तीन दिवसांत म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचणार आहे. कॅनॉलसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)वीस कोटींची पाणीपट्टी थकित जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनीही म्हैसाळ योजना सुरू ठेवण्यासाठी थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. गेल्या आवर्तनाची थकित पाणीपट्टी १५ सप्टेंबरपर्यंत भरावी अन्यथा थकित पाणीपट्टीचा बोजा सातबारावर नोंद करण्यासाठी महसूल विभाग, जलसंपदा विभागाला सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. म्हैसाळ पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता एस. के. धुमाळ यांनी सुमारे २० कोटी थकित पाणीपट्टी असून, त्यापैकी १० कोटी रुपये वीजबिल असल्याचे त्यांनी सांगितले.