शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सबमिट केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीही जिल्ह्यात वीस हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शासनाने १५ ऑगस्टपासून ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ ही ‘ई-पीक’ पाहणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पिकासंदर्भातील माहिती ॲपवर कशी भरावी, याबाबतची माहिती तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात देणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यात पाच लाख ३८ हजार शेतकरी असून, बहुतांश शेतकरी शेतात जाऊन ‘ऑन द स्पॉट’ पीक पाहणी नोंदवत आहेत. या शेतकऱ्यांना माहिती भरताना अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ही मोहीम शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.

चौकट

कोणत्या तालुक्यात किती नोंदणी?

तालुका नोंदणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह

आटपाडी २८७३ २७२७ १४६

कडेगाव २४६१ २२७६ १८६

क.महांकाळ ८८० ८०७ ७३

खानापूर ३५०० ३३०५ १९५

जत १२१८ ११३७ ८१

तासगाव १९०२ १७७६ १२६

पलूस १४५४ १३४३ १११

मिरज १७०० १५६२ १३८

वाळवा ३२१२ २९९९ २१३

शिराळा १३०३ १२०१ १०२

एकूण २०५०३ १९१३३ १३७०

चौकट

एकूण नोंदणी : २०५०३

ॲक्टिव्ह : १९१३३

इनॲक्टिव्ह : १३७०

चौकट

हाताळणी कोण शिकवणार?

‘ई-पीक’ पाहणी ही शासनाची संकल्पना शेतकऱ्यांच्यादृष्टीने चांगली आहे. पण ही योजना राबवताना शेतकरी अशिक्षित असून, त्यांना मोबाईलमधील ॲप कसे हाताळावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- तुकाराम पाटील, शेतकरी.

कोट

माझे शिक्षण काहीच नाही. मुलांचेही जेमतेम शिक्षण झाले असून, ‘ई-पीक’ पाहणीचे ॲप कसे वापरावे, हे आम्हाला काहीच माहीत नाही. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले तरच नवीन ॲपचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

- शहाजी शिंदे, शेतकरी.

कोट

‘ई-पीक’ पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. अडचण असेल त्याठिकाणी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून, पंधरा दिवसात २१ हजार शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ नोंदणी केली आहे.

- मनोज वेताळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.