शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सबमिट केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीही जिल्ह्यात वीस हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शासनाने १५ ऑगस्टपासून ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ ही ‘ई-पीक’ पाहणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पिकासंदर्भातील माहिती ॲपवर कशी भरावी, याबाबतची माहिती तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात देणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यात पाच लाख ३८ हजार शेतकरी असून, बहुतांश शेतकरी शेतात जाऊन ‘ऑन द स्पॉट’ पीक पाहणी नोंदवत आहेत. या शेतकऱ्यांना माहिती भरताना अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ही मोहीम शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.

चौकट

कोणत्या तालुक्यात किती नोंदणी?

तालुका नोंदणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह

आटपाडी २८७३ २७२७ १४६

कडेगाव २४६१ २२७६ १८६

क.महांकाळ ८८० ८०७ ७३

खानापूर ३५०० ३३०५ १९५

जत १२१८ ११३७ ८१

तासगाव १९०२ १७७६ १२६

पलूस १४५४ १३४३ १११

मिरज १७०० १५६२ १३८

वाळवा ३२१२ २९९९ २१३

शिराळा १३०३ १२०१ १०२

एकूण २०५०३ १९१३३ १३७०

चौकट

एकूण नोंदणी : २०५०३

ॲक्टिव्ह : १९१३३

इनॲक्टिव्ह : १३७०

चौकट

हाताळणी कोण शिकवणार?

‘ई-पीक’ पाहणी ही शासनाची संकल्पना शेतकऱ्यांच्यादृष्टीने चांगली आहे. पण ही योजना राबवताना शेतकरी अशिक्षित असून, त्यांना मोबाईलमधील ॲप कसे हाताळावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- तुकाराम पाटील, शेतकरी.

कोट

माझे शिक्षण काहीच नाही. मुलांचेही जेमतेम शिक्षण झाले असून, ‘ई-पीक’ पाहणीचे ॲप कसे वापरावे, हे आम्हाला काहीच माहीत नाही. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले तरच नवीन ॲपचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

- शहाजी शिंदे, शेतकरी.

कोट

‘ई-पीक’ पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. अडचण असेल त्याठिकाणी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून, पंधरा दिवसात २१ हजार शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ नोंदणी केली आहे.

- मनोज वेताळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.