शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सासरच्या त्रासाला कंटाळुन बेवनूरला विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान ...

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. म्हणून सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. त्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील गोरख बाबासाहेब लवटे (वय ४१, रा बुध्याळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी जत पाेलीस ठाण्यात दिली आहे.

ऋतुजा हिचा विवाह बेवनूर येथील अमोल आप्पा सरगर याच्याबरोबर २५ जून २०२० रोजी झाला. अमोल हा राजकोट (राजस्थान) येथे सोन्याच्या आटणीचे काम करतो. लग्नानंतर अमोल तिला राजकाेट येथे घेऊन गेला. एप्रिल महिन्यात दोघे गावी आले होते. अमाेल ऋतुजाकडे साेन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दाेन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत हाेता. जोपर्यंत दोन लाख रुपये आणत नाहीस, तोपर्यंत तुला माहेरी पाठवणार नाही, असे म्हणून मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

मंगळवारी दुपारी १ वाजता गोरख लवटे यांना बेवनूर येथील त्यांचे मावसभाऊ तानाजी अशोक सरगर यांनी फोन करून ऋतुजाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ लवटे कुटुंबीय बेवनूरमध्ये आले. ऋतुजाच्या अंगावर कोठेही व्रण नव्हते; मात्र तिच्या गळ्यावर काळसर व्रण दिसत होते. जावई अमोल याच्यासह सरगर कुटुंबियांनी ऋतुजाला विजेचा धक्का बसल्याचे सांगत शेतातच अंत्यविधी केले. यावेळी गाेरख लवटे यांना संशय आल्याने त्यांनी मावसभाऊ अशोक सरगर यांना घेऊन अमोल यास विचारले असता, त्याने ‘ऋतुजाने गळफास घेतला होता. मी रानातून आल्यावर तिला खाली उतरविले. ताेपर्यंत तिचा मृत्यू झाला हाेता.’ असे सांगितले. यानंतर लवटे यांनी नवरा अमोल हाच ऋतुजाच्या मृत्यूस जबाबदार आहे. अशी तक्रार दिली आहे. ऋतुजाने आत्महत्या केलेली असतानाही अमाेलने पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संशय वाढला आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.