शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या त्रासाला कंटाळुन बेवनूरला विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान ...

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. म्हणून सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. त्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील गोरख बाबासाहेब लवटे (वय ४१, रा बुध्याळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी जत पाेलीस ठाण्यात दिली आहे.

ऋतुजा हिचा विवाह बेवनूर येथील अमोल आप्पा सरगर याच्याबरोबर २५ जून २०२० रोजी झाला. अमोल हा राजकोट (राजस्थान) येथे सोन्याच्या आटणीचे काम करतो. लग्नानंतर अमोल तिला राजकाेट येथे घेऊन गेला. एप्रिल महिन्यात दोघे गावी आले होते. अमाेल ऋतुजाकडे साेन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दाेन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत हाेता. जोपर्यंत दोन लाख रुपये आणत नाहीस, तोपर्यंत तुला माहेरी पाठवणार नाही, असे म्हणून मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

मंगळवारी दुपारी १ वाजता गोरख लवटे यांना बेवनूर येथील त्यांचे मावसभाऊ तानाजी अशोक सरगर यांनी फोन करून ऋतुजाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ लवटे कुटुंबीय बेवनूरमध्ये आले. ऋतुजाच्या अंगावर कोठेही व्रण नव्हते; मात्र तिच्या गळ्यावर काळसर व्रण दिसत होते. जावई अमोल याच्यासह सरगर कुटुंबियांनी ऋतुजाला विजेचा धक्का बसल्याचे सांगत शेतातच अंत्यविधी केले. यावेळी गाेरख लवटे यांना संशय आल्याने त्यांनी मावसभाऊ अशोक सरगर यांना घेऊन अमोल यास विचारले असता, त्याने ‘ऋतुजाने गळफास घेतला होता. मी रानातून आल्यावर तिला खाली उतरविले. ताेपर्यंत तिचा मृत्यू झाला हाेता.’ असे सांगितले. यानंतर लवटे यांनी नवरा अमोल हाच ऋतुजाच्या मृत्यूस जबाबदार आहे. अशी तक्रार दिली आहे. ऋतुजाने आत्महत्या केलेली असतानाही अमाेलने पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संशय वाढला आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.