शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

सासरच्या त्रासाला कंटाळुन बेवनूरला विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान ...

संख : बेवनूर (ता. जत) येथील ऋतुजा अमोल सरगर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. म्हणून सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. त्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील गोरख बाबासाहेब लवटे (वय ४१, रा बुध्याळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी जत पाेलीस ठाण्यात दिली आहे.

ऋतुजा हिचा विवाह बेवनूर येथील अमोल आप्पा सरगर याच्याबरोबर २५ जून २०२० रोजी झाला. अमोल हा राजकोट (राजस्थान) येथे सोन्याच्या आटणीचे काम करतो. लग्नानंतर अमोल तिला राजकाेट येथे घेऊन गेला. एप्रिल महिन्यात दोघे गावी आले होते. अमाेल ऋतुजाकडे साेन्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून दाेन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत हाेता. जोपर्यंत दोन लाख रुपये आणत नाहीस, तोपर्यंत तुला माहेरी पाठवणार नाही, असे म्हणून मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

मंगळवारी दुपारी १ वाजता गोरख लवटे यांना बेवनूर येथील त्यांचे मावसभाऊ तानाजी अशोक सरगर यांनी फोन करून ऋतुजाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ लवटे कुटुंबीय बेवनूरमध्ये आले. ऋतुजाच्या अंगावर कोठेही व्रण नव्हते; मात्र तिच्या गळ्यावर काळसर व्रण दिसत होते. जावई अमोल याच्यासह सरगर कुटुंबियांनी ऋतुजाला विजेचा धक्का बसल्याचे सांगत शेतातच अंत्यविधी केले. यावेळी गाेरख लवटे यांना संशय आल्याने त्यांनी मावसभाऊ अशोक सरगर यांना घेऊन अमोल यास विचारले असता, त्याने ‘ऋतुजाने गळफास घेतला होता. मी रानातून आल्यावर तिला खाली उतरविले. ताेपर्यंत तिचा मृत्यू झाला हाेता.’ असे सांगितले. यानंतर लवटे यांनी नवरा अमोल हाच ऋतुजाच्या मृत्यूस जबाबदार आहे. अशी तक्रार दिली आहे. ऋतुजाने आत्महत्या केलेली असतानाही अमाेलने पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संशय वाढला आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.