शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:38 IST

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्दे प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे.

एमआयडिसीमधील पुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने काही उद्योगांमधील उत्पादन थांबल्याचेही सांगण्यात आले. तर ८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात पाणीबाणी निर्माण झाली असून नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडिसी ही जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. येथे काही मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये अनेकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या टॅँकरच्या अपघातानंतर येथील उद्योगांमधील काम ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिकही खासगी टॅँकरचे पाणी मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. मात्र त्यातून अनेक व्यवसायांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागवली जात आहे. काही उद्योगांच्या परिसरात बोअरवेलचे पाणी मिळत आहे. येत्या चार दिवसात औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा सुरू न झाल्यास पाण्याच्या वापरातून उत्पादन होत असलेल्या अनेक उद्योगांमधील उत्पादन प्रक्रीया ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

औद्योगिक वसाहतीची पाणी समस्या गंभीर बनलेली असतानाच एमआयडिसी पाणी पुरवठा करीत असलेल्या कुवारबाव, मिरजोळे, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिºयासह आठ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातही अभूतपूर्व पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांच्या विहिरी आहेत त्यांना टंचाईची झळ कमी बसत असली तरी असंख्य कुटुंब केवळ नळपाणी योजनेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे खुपच हाल होत आहेत.

खासगी टॅँकरकडून पुरवठापाणी टंचाईमुळे खासगी टॅँकरचे पाणी विकत घेणे हाच अनेकांसमोरील एकमेव पर्याय ठरत आहे. त्यामुळे खासगी वाहनातून टॅँकरने पाणी पुरवठा करणाºयांकडे पाणी मागणी करणाºयांची संख्या वाढली आहे. परिणामी टॅँकरचे पाणीही वेळेत मिळत नसल्याची स्थिती आहे. समस्या लक्षात घेऊन खासगी टॅँकरने पाणी पुरवठा करणारेही जनतेला सहकार्य करीत आहेत.

टॅँकरने पाणी पुरवाएमआयडिसीने पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असल्याची दवंडी रीक्षातून देण्यात आली. मात्र आपत्कालिन स्थितीत गावातील नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. अजून किती काळ पाणी मिळणार नाही, याबाबत निश्चिती नसल्याने ग्रामपंचायतीने प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी