शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

‘त्या’ पित्यावर मुलांच्या खुनाचा गुन्हा!

By admin | Updated: March 15, 2017 23:06 IST

आत्महत्या प्रकरण; बुडालेल्या एका मुलाचा शोध अद्यापही सुरूच

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात फेकून देऊन मुलांचा खून केल्याप्रकरणी पित्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान, नदीपात्रात बुडालेल्या दोन मुलांपैकी एका मुलाचा शोध अद्यापही सुरू आहे. बुधवारी दिवसभर पोलिस, नातेवाईक व पाणबुड्यांनी नदीपात्राचा परिसर पिंजून काढला. मात्र, बेपत्ता मुलगा रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. मलकापुरातील बैलबाजार रोड परिसरात राहणाऱ्या अमोल भोंगाळे व त्याची पत्नी मीनाक्षी यांनी दोन मुले व एका मुलीला नदीपात्रात फेकून देऊन स्वत:ही नदीपात्रात उडी घेतली होती. यामधून पती अमोल भोंगाळे हा बचावला, तर पत्नी मीनाक्षी, मुलगा हर्ष, श्रवण व चार महिन्यांची मुलगी बुडाली. मंगळवारी पहाटे दाम्पत्याने हे कृत्य केले. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अमोलकडे पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवित नदीपात्रात बुडालेल्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी कोयनेश्वर मंदिरापासून काही अंतरावर मीनाक्षी, चार महिन्यांची मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह पात्राबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. त्यानंतर उशिरा ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अमोल गत पाच वर्षांपासून कोठेही कामास जात नव्हता. त्याने घरखर्च व इतर खर्च भागविण्यासाठी हातउसने तसेच कर्ज स्वरूपातही अनेकांकडून पैसे घेतले होते. भिशीच्या माध्यमातूनही त्याने आर्थिक उलाढाल केली होती. पोलिस तपासात प्रथमदर्शनी अमोलवर २७ लाखांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. या कर्जामुळेच त्याने व पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला. दोघांनी मंगळवारी रात्री सुरुवातीला हर्ष व श्रवण या मुलांना तसेच चार महिन्यांच्या मुलीला नदीपात्रात फेकून दिले; आणि त्यानंतर दोघांनी नदीपात्रात उड्या घेतल्या, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. मुलांचा खून केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अमोलवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)कऱ्हाडातच अंत्यसंस्कारसांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे हे भोंगाळे कुटुंबीयांचे मूळ गाव असून, घटनेनंतर तेथील नातेवाईक कऱ्हाडात आले होते. मीनाक्षीसह चार महिन्यांची मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांनी मंगळवारी रात्री या नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.