शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सांगलीकरांच्या नशिबी गटारगंगेचे पाणी, वाळू तस्करीने पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नद्यांमधील बेकायदा वाळू उपसा, सोडली जाणारी रसायने आणि सांगली शहराचे थेट कृष्णेत मिसळणारे सांडपाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नद्यांमधील बेकायदा वाळू उपसा, सोडली जाणारी रसायने आणि सांगली शहराचे थेट कृष्णेत मिसळणारे सांडपाणी यामुळे नद्यांची गटारगंगा होत आहे. सांडपाणी प्रक्रियेचे प्रकल्प कोलमडले असून सांगलीकरांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे.

सांगली शहरासाठी शेरीनाला कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरला आहे. लाखो रुपये खर्चानंतरही महापालिकेला कायमस्वरुपी इलाज करता आलेला नाही. त्यामुळे सांगलीकर जणू विषयुक्त पाणी पित आहेत. वारणा नदीत काठावरील साखर कारखान्यांतून रसायनमिश्रित सांडपाणी थेट सोडल्याने दरवर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडतात. विशेषत: पावसाळ्यात पूर येतो, तेव्हा कारखाने बेमालूमपणे नदीत रसायने सोडतात. मृत माशांच्या माध्यमातून त्यांचे पाप पाण्यावर तरंगत राहते.

चोरटा वाळू उपसा मात्र नद्यांसाठी शाप ठरला आहे. जत, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांत वाळू तस्करांचा उच्छाद सुरू आहे. चोरटा वाळूउपसा राजरोस सुरू आहे. यामुळे शेतीला धोका पोहोचत आहे. याशिवाय पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरणदेखील थांबले आहे. जतमध्ये बोर नदीला अक्षरश: गटारीची अवस्था प्राप्त झाली आहे. येरळा, अग्रणी, महाकाली या नद्यांमधूनही वाळू उपसा अखंड सुरू आहे.

जिल्ह्यातील अैाद्योगिक क्षेत्र सुदैवाने नदीकाठी नाही. कुपवाड वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वर्षानुवर्षे बंद आहे. मोठे कारखाने सांडपाणी परिसरात उघड्यावर सोडून देतात. भूगर्भात खोलवर कूपनलिका खोदून त्यामध्येही सांडपाणी सोडले जाते. त्याचा परिणाम म्हणून सावळी, बामणोली, तानंग भागातील पिण्याचे पाणी प्रदूषित झाले आहे. विहिरी व कूपनलिकांत रसायने पाझरल्याने पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

चौकट

जिल्ह्यात असे आहेत प्रदूषणकारी प्रकल्प

अतिप्रदूषणकारी - ४५

मध्यम प्रदूषणकारी - ५

छोटे प्रदूषणकारी - १७६

सामान्य प्रदूषणकारी - १०

प्रदूषण विरहीत प्रकल्प - १,५२३

मळी निर्माण करणारे कारखाने - ७

धान्यवर मळी निर्मिती करणारे - २

साखर कारखाने व डिस्टीलरी - १६

सिमेंट कारखाना १

कोट

जिल्ह्यात प्रदूषणाची स्थिती गंभीर नाही. शहरी भागात हवेचे प्रदूषण मध्यम स्वरूपाचे आहे. सांगली शहराचा शेरीनाला पाण्याचे प्रदूषण करणारा गंभीर स्त्रोत ठरला आहे. शेतीचे क्षेत्र खूपच जास्त आणि शहरांलगत असल्याने प्रदूषण निर्देशांक नियंत्रणात आहे.

- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी

प्रदूषणावर नियंत्रणासाठी सर्वांचेच दुर्लक्ष आहे. वेगाने होणारा वाळू उपसा, वृक्षतोड, कारखान्यांतून प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाणारे सांडपाणी, शहरांच्या सांडपाण्याचे थेट नदीच्या पाण्यात विसर्जन यामुळे सांगलीचा प्रवास अतिप्रदूषणाकडे सुरू आहे. तो रोखण्यासाठी प्रशासन आणि लोकसहभाग या दोहोंची गरज आहे.

- डॉ. हर्षद दिवेकर, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी