शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

By admin | Updated: March 5, 2016 00:22 IST

चंद्रकांत पाटील : संख येथील बैठकीत चारा, पाणी टंचाईचा आढावा

संख : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.संख (ता. जत) येथे ते आढावा बैठकीत बोलत होते. आढावा बैठकीमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई, म्हैसाळ योजनेचा आढावा घेतला. पाणी टंचाईचा आढावा तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गव्हाणे, उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी, तर म्हैसाळ योजनेचा आढावा कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पन्न समितीच्या आवारात गोदाम, कोल्ड स्टोअरेज बांधणार आहोत. तसेच मागेल त्याला टॅँकर दिले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्व भागातील ओढापात्रात सोडण्यासाठी २०० कोटी रुपयांची गरज आहे. ते पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी जनावरांना चारा छावणीची मागणी केली. तसेच जनावरांना छावणी सुरू करण्यासाठी चारा डेपो किंवा छावण्या सुरू केल्या जातील. खा. संजय पाटील यांनी, २०० कोटी रुपये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी देऊन ८० गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. विलासराव जगताप म्हणाले की, म्हैसाळ योजनेसाठी २०० कोटी निधी द्यावा, तालुका विभाजन करावे, तालुक्यासाठी पूर्व भागात एक अतिरिक्त तहसीलदार देण्याची मागणी केली आहे. यावेळी आ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी अशोक पाटील, माजी सभापती आर. के. पाटील, राजेंद्र कन्नुरे, डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या सूचना स्वीकारणारसध्या जो शेतकऱ्यांच्या सुविधांवर बोलतो तो नेता आणि जो शेतकऱ्यांच्या सवयीवर बोलतो तो शत्रू, असे मानण्याची पध्दत वाढली आहे. तुम्ही सूचना करा, त्या स्वीकारल्या जातील असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.