शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:19 IST

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. ...

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. त्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ. जयसिंगपुरात शनिवारी (दि. २३) रोजी ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविणार आहे.यावेळी रविकांत तुपकर, महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, यंदा कमी उसामुळे गळीत हंगाम तीन महिनेदेखील चालण्याची शक्यता नाही. उत्पादनाअभावी चांगल्या दराची अपेक्षा आहे. सरकारने साखरेचे ३१ रुपयांचे पायाभूत मूल्य वाढवून ३५ रुपये करावे. कर्नाटकात ऊस उत्पादन २१ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सरकारने लादलेली झोनबंदी मान्य नाही. शेतीमाल देशात कोठेही विकण्याचा हक्क आहे. ‘एक देश एक कर’ असे धोरण असताना झोनबंदी म्हणजे दांभिकपणा आहे. त्याविरुद्ध कायदा हातात घेऊन कर्नाटकशी संघर्ष करावा लागेल. उसाची एफआरपी कृषिमूल्य आयोगाने यंदा वाढवली नाही. ती वाढविण्याची मागणी आहे. एकरी उत्पादन घटून खर्चही वाढल्याने ऊस धोरण नव्याने ठरवावे लागेल. यंदा साखर आयात झाली नाही, तर साखर उद्योगाला चांगले दिवस येतील. गेल्यावर्षी पाकिस्तानमधून कच्ची साखर आणून सरकाने चूक केली.शेट्टी म्हणाले की, एकरकमी एफआरपी शक्य नसल्याचा कारखानदारांचा सूर मान्य नाही. तो आमचा अधिकार असून, घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगी सरकारने त्यासाठी कारखान्यांना मदत करावी, सॉफ्ट लोन द्यावे. गतवर्षीची एफआरपी न दिल्याने सात कारखान्यांना गाळप परवाना मिळालेला नाही. गाळप सुरू केले, तर साखर आयुक्त प्रतिटनाला पाचशे रुपये दंड ठोठावणार आहेत. बिले न देणाºया कारखान्यांना शेतकºयांनी ऊस घालू नये.महाशिवआघाडीचे निमंत्रण नाहीशेट्टी म्हणाले, सरकारमध्ये सामील होण्याचे महाशिवआघाडीचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मिळाले तरी, त्यांच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कितपत केंद्रस्थानी आहे हे पाहू. केंद्र व राज्यातील भाजपने शेतकºयांना फसवले आहे. त्यांना बाजूला ठेवून सरकार आणण्यासाठी काही गोष्टी नजरेआड कराव्या लागतील. अवकाळीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महिन्याभरात ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. वाढीव भरपाईसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.पीकविमा कंपन्यांचे लेखापरीक्षण करापीकविमा कंपन्यांनी गेल्या वर्षीबारा हजार कोटींचा नफा मिळवला. यंदा मात्र ते पळ काढताहेत. सरकारने त्यांच्या नफ्याचे लेखापरीक्षण करावे. पीकविम्यासाठी स्वत:ची कंपनी सुरु करावी.