शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:19 IST

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. ...

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. त्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ. जयसिंगपुरात शनिवारी (दि. २३) रोजी ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविणार आहे.यावेळी रविकांत तुपकर, महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, यंदा कमी उसामुळे गळीत हंगाम तीन महिनेदेखील चालण्याची शक्यता नाही. उत्पादनाअभावी चांगल्या दराची अपेक्षा आहे. सरकारने साखरेचे ३१ रुपयांचे पायाभूत मूल्य वाढवून ३५ रुपये करावे. कर्नाटकात ऊस उत्पादन २१ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सरकारने लादलेली झोनबंदी मान्य नाही. शेतीमाल देशात कोठेही विकण्याचा हक्क आहे. ‘एक देश एक कर’ असे धोरण असताना झोनबंदी म्हणजे दांभिकपणा आहे. त्याविरुद्ध कायदा हातात घेऊन कर्नाटकशी संघर्ष करावा लागेल. उसाची एफआरपी कृषिमूल्य आयोगाने यंदा वाढवली नाही. ती वाढविण्याची मागणी आहे. एकरी उत्पादन घटून खर्चही वाढल्याने ऊस धोरण नव्याने ठरवावे लागेल. यंदा साखर आयात झाली नाही, तर साखर उद्योगाला चांगले दिवस येतील. गेल्यावर्षी पाकिस्तानमधून कच्ची साखर आणून सरकाने चूक केली.शेट्टी म्हणाले की, एकरकमी एफआरपी शक्य नसल्याचा कारखानदारांचा सूर मान्य नाही. तो आमचा अधिकार असून, घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगी सरकारने त्यासाठी कारखान्यांना मदत करावी, सॉफ्ट लोन द्यावे. गतवर्षीची एफआरपी न दिल्याने सात कारखान्यांना गाळप परवाना मिळालेला नाही. गाळप सुरू केले, तर साखर आयुक्त प्रतिटनाला पाचशे रुपये दंड ठोठावणार आहेत. बिले न देणाºया कारखान्यांना शेतकºयांनी ऊस घालू नये.महाशिवआघाडीचे निमंत्रण नाहीशेट्टी म्हणाले, सरकारमध्ये सामील होण्याचे महाशिवआघाडीचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मिळाले तरी, त्यांच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कितपत केंद्रस्थानी आहे हे पाहू. केंद्र व राज्यातील भाजपने शेतकºयांना फसवले आहे. त्यांना बाजूला ठेवून सरकार आणण्यासाठी काही गोष्टी नजरेआड कराव्या लागतील. अवकाळीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महिन्याभरात ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. वाढीव भरपाईसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.पीकविमा कंपन्यांचे लेखापरीक्षण करापीकविमा कंपन्यांनी गेल्या वर्षीबारा हजार कोटींचा नफा मिळवला. यंदा मात्र ते पळ काढताहेत. सरकारने त्यांच्या नफ्याचे लेखापरीक्षण करावे. पीकविम्यासाठी स्वत:ची कंपनी सुरु करावी.