शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना ...

उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. थकीत कर्जदारांना लाभ मिळाला, पण नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. दोन लाखांवरील कर्जदारांचे पैसे भरून घेऊन दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. दोन लाखापर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान दोन वर्षे झाले तरी अजून मिळाले नाही. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. कर्ज परतफेड करून चुकलो की काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी ३० जूनपर्यंत पीककर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याचे अट होती. अनुदान मिळेल या आशेवरती शेतकरी स्वतः जवळ पैसे नसतानाही उसने पैसे घेऊन, सोने गहाण ठेवून आपले कर्जफेड केले होते. दोन वर्षे संपले तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.