शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मिरज पश्चिम भागातील शेतकरी धीराने उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST

कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीला जुलैमध्ये आलेल्या महापुराचा फटका बसला. मिरज पश्चिम भागातील अनेक गावांतील नागरिकांचे स्थलांतर ...

कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीला जुलैमध्ये आलेल्या महापुराचा फटका बसला. मिरज पश्चिम भागातील अनेक गावांतील नागरिकांचे स्थलांतर झाले. या परिस्थितीत घरांसह शेतीचेही प्रचंड नुकसान होऊनही येथील नागरिक धीराने पुढच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत. पूर ओसरल्यावर स्वच्छतेची कामे संपवून शेतातील कामे सुरू केली आहेत. दुकाने, व्यवसाय, दैनंदिन व्यवहार सुरू होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीतील आयर्विन पुलानजीक ४० फूट झाली की कसबे व माैजे डिग्रजदरम्यानचा बंधारा पाण्याखाली जातो व गावात पाणी शिरते. यावेळी पाणी ५४ फुटांवर गेले होते. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळे या गावांना; तर वारणा नदीच्या पुराचा फटका दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, समडोळी, कवठेपिरान या गावांना बसला. यात १० हजार एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पूर ओसरल्यानंतर गावागावात वीज पुरवठा, पाणी पुरवठा सुरू झाला आहे. घरांची, दुकानांची स्वच्छता करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, काही संस्था, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक व तरुण मंडळींनी स्वच्छता मोहीम राबविली. काही गावांचा अपवाद वगळता इतर गावांमध्ये धान्य वाटप करण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

मिरज पश्चिम भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. २०१९ व २०२१ च्या पुराने शेतीला फटका बसला आहे. अशा परिस्थितीतही येथील शेतकरी आता नव्या उमेदीने आणि धीराने नव्या आव्हानांना सामोरा जात आहे. ही संकटकाळात एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.