शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

बागायती पट्ट्यात वन्यप्राण्यांच्या एन्ट्रीने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी ...

सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी धिंगाणा घातला, तर बुधवारी चक्क सांगलीत बिबट्यानेच एन्ट्री केली.

जिल्ह्यात वनक्षेत्र तुलनेने तीन टक्के इतकेच आहे. तरीही चांदोली, सागरेश्वर, दंडोबा येथे वन्यप्राणी मुबलक आहेत. चांदोलीमध्ये तब्बल ५३ बिबटे असल्याची नोंद आहे. त्यातील बहुतांश उसाच्या शेतीत दिसतात, असा प्राणीप्रेमींचा अनुभव आहे. बिबट्याचा प्रजनन कालावधी ९० दिवस असतो. त्यामुळे उसाच्या गर्द शेतीत जन्म आणि तेथेच राहण्याने, ऊसशेती हेच त्याचे घर बनत आहे. पण ऑक्टोबरपासून उसाची तोड सुरू होताच राने रिकामी पडतात आणि त्यातून बिबट्यांसह वन्यप्राणी बाहेर पडतात.

वन विभागाक़डील नोंदींनुसार २०१६ पासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आठजण मरण पावले आहेत, तर १९ जण जखमी झाले आहेत. अर्थात कागदावर न आलेले आकडे याहून अधिक आहेत. उसाच्या शेतात साळिंदर, कोल्हे, लांडगे हेदेखील मोठ्या संख्येने आढळतात, यातील साळिंदरांची सर्रास शिकार होते, अन्य प्राणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. गेल्या काही दिवसांत गव्यांचा वाढलेला वावर हीदेखील शेतकऱ्यांची डोकेदुखीची बाब ठरली आहे. मणेराजुरीमध्ये पंधरवड्यापूर्वी दोन गव्यांनी द्राक्षबागेची नासधूस केली. ऊसशेती रिकामी झाल्याने ते बागायती शेतीत आले. वन्यप्राण्यांची शहरातील घुसखोरी बिबट्यापर्यंत वाढल्याने वन विभागाच्या सज्जतेची कसोटी लागली आहे.

चौकट

वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकूया

बिबट्या हा वारंवार शहरात येणारा प्राणी नसला तरी, गव्यांच्या बाबतीत मात्र तसा अनुभव नाही. नदीकाठच्या शेतीत तो वरचे वर येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये जागर आणि प्रशिक्षण आवश्यक ठरले आहे. वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने मानवी हल्ल्यात या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे उदाहरण अद्याप नाही, हीच काय ती जमेची बाजू आहे.