शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

बागायती पट्ट्यात वन्यप्राण्यांच्या एन्ट्रीने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी ...

सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी धिंगाणा घातला, तर बुधवारी चक्क सांगलीत बिबट्यानेच एन्ट्री केली.

जिल्ह्यात वनक्षेत्र तुलनेने तीन टक्के इतकेच आहे. तरीही चांदोली, सागरेश्वर, दंडोबा येथे वन्यप्राणी मुबलक आहेत. चांदोलीमध्ये तब्बल ५३ बिबटे असल्याची नोंद आहे. त्यातील बहुतांश उसाच्या शेतीत दिसतात, असा प्राणीप्रेमींचा अनुभव आहे. बिबट्याचा प्रजनन कालावधी ९० दिवस असतो. त्यामुळे उसाच्या गर्द शेतीत जन्म आणि तेथेच राहण्याने, ऊसशेती हेच त्याचे घर बनत आहे. पण ऑक्टोबरपासून उसाची तोड सुरू होताच राने रिकामी पडतात आणि त्यातून बिबट्यांसह वन्यप्राणी बाहेर पडतात.

वन विभागाक़डील नोंदींनुसार २०१६ पासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आठजण मरण पावले आहेत, तर १९ जण जखमी झाले आहेत. अर्थात कागदावर न आलेले आकडे याहून अधिक आहेत. उसाच्या शेतात साळिंदर, कोल्हे, लांडगे हेदेखील मोठ्या संख्येने आढळतात, यातील साळिंदरांची सर्रास शिकार होते, अन्य प्राणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. गेल्या काही दिवसांत गव्यांचा वाढलेला वावर हीदेखील शेतकऱ्यांची डोकेदुखीची बाब ठरली आहे. मणेराजुरीमध्ये पंधरवड्यापूर्वी दोन गव्यांनी द्राक्षबागेची नासधूस केली. ऊसशेती रिकामी झाल्याने ते बागायती शेतीत आले. वन्यप्राण्यांची शहरातील घुसखोरी बिबट्यापर्यंत वाढल्याने वन विभागाच्या सज्जतेची कसोटी लागली आहे.

चौकट

वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकूया

बिबट्या हा वारंवार शहरात येणारा प्राणी नसला तरी, गव्यांच्या बाबतीत मात्र तसा अनुभव नाही. नदीकाठच्या शेतीत तो वरचे वर येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये जागर आणि प्रशिक्षण आवश्यक ठरले आहे. वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने मानवी हल्ल्यात या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे उदाहरण अद्याप नाही, हीच काय ती जमेची बाजू आहे.