शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

शेतकरी संघटना नेते प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देत आंदोलनाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले ...

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देत आंदोलनाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे; पण तोडग्यासाठीची समिती सर्वसमावेशक असायला हवी. स्थगितीमुळे कायद्यांची अंमलबजावणी आपोआपच थांबली आहे. देशातील अनेक राज्यांत कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नव्हती, त्यालाही स्थगितीमुळे बळ मिळाले आहे. आता कायदे मागे घेणे हाच मार्ग आहे. स्थगितीमुळे आंदोलकांचा अंशत: विजय झाला आहे. बहुमताच्या जोरावर कोणावरही अन्याय करण्याचा प्रकार आतातरी थांबेल.

-----

कृषी कायद्यांविषयी आता सर्वांगीण विचार होईल

- संजय कोले, प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना

कृषी कायद्यांविषयी आतापर्यंत एकतर्फी प्रचार सुरू होता. कायदे आता न्यायालयात गेल्याने त्यावर सर्वांगीण विचार होईल. तात्पुरती स्थगिती देेऊन समिती नेमण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे, असेच म्हणावे लागेल. त्रुटी दूर करून कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी आता करता येईल. यातून शेतकऱ्यांच्याच फायद्याचा निर्णय होईल. आंदोलन रेटत राहणे शांततेसाठी योग्य नाही.

-------

केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले

महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देताना केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आहे. गेल्या सहा-सात वर्षांत सरकार कोणापुढेही झुकत नव्हते; पण अन्याय सहन करणार नाही, अशी गर्जना करत शेतकऱ्यांनी झुकणे भाग पाडले. कायद्यांच्या अभ्यासासाठीची समिती सर्वसमावेशक असावी. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही समावेश करावा. कायद्याचे समर्थन करणाऱ्यांचाच समितीत भरणा असू नये.

---------