शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतकरी संघटना नेते प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देत आंदोलनाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले ...

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देत आंदोलनाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे; पण तोडग्यासाठीची समिती सर्वसमावेशक असायला हवी. स्थगितीमुळे कायद्यांची अंमलबजावणी आपोआपच थांबली आहे. देशातील अनेक राज्यांत कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नव्हती, त्यालाही स्थगितीमुळे बळ मिळाले आहे. आता कायदे मागे घेणे हाच मार्ग आहे. स्थगितीमुळे आंदोलकांचा अंशत: विजय झाला आहे. बहुमताच्या जोरावर कोणावरही अन्याय करण्याचा प्रकार आतातरी थांबेल.

-----

कृषी कायद्यांविषयी आता सर्वांगीण विचार होईल

- संजय कोले, प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना

कृषी कायद्यांविषयी आतापर्यंत एकतर्फी प्रचार सुरू होता. कायदे आता न्यायालयात गेल्याने त्यावर सर्वांगीण विचार होईल. तात्पुरती स्थगिती देेऊन समिती नेमण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे, असेच म्हणावे लागेल. त्रुटी दूर करून कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी आता करता येईल. यातून शेतकऱ्यांच्याच फायद्याचा निर्णय होईल. आंदोलन रेटत राहणे शांततेसाठी योग्य नाही.

-------

केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले

महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देताना केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आहे. गेल्या सहा-सात वर्षांत सरकार कोणापुढेही झुकत नव्हते; पण अन्याय सहन करणार नाही, अशी गर्जना करत शेतकऱ्यांनी झुकणे भाग पाडले. कायद्यांच्या अभ्यासासाठीची समिती सर्वसमावेशक असावी. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही समावेश करावा. कायद्याचे समर्थन करणाऱ्यांचाच समितीत भरणा असू नये.

---------