शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 2, 2017 23:42 IST

उमदीतील घटना; खासगी सावकारकीचा तगादा

जत : उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. भगवंत दुंडाप्पा तेली-मेडीदार (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, उमदी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.भगवंत तेली यांची सहा एकर जिरायत शेतजमीन आहे. बॅँक आॅफ इंडियाच्या उमदीतील शाखेतून दोन लाखाचे पीककर्ज घेऊन त्यांनी एक एकर डाळिंब बाग केली आहे. मात्र कमी पावसामुळे बाग वाया गेली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी दोघा खासगी सावकारांकडून प्रत्येकी दोन लाखाचे कर्ज घेऊन शेतात चार कूपनलिका खोदल्या होत्या. तथापि, त्यांनाही पाणी लागले नाही. या चार लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात त्यांनी दोघा सावकारांना प्रत्येकी दोन एकर याप्रमाणे चार एकर शेतजमीन लिहून दिली आहे. डाळिंब बागेतून झालेले आर्थिक नुकसान आणि वाया गेलेल्या कूपनलिका यामुळे कर्जाची फेड कशी करायची, या विवंचनेत ते होते. त्यात त्यांनी बुधवारी रात्री आठ वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. घरातील लोकांना ते समजल्यानंतर त्यांनी भगवंत तेली यांना जतमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी प्रकृती गंभीर )बनल्यामुळे त्यांना सायंकाळी पाच वाजता मिरजेतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. भगवंत तेली यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला असून मेमधील तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली होती. (वार्ताहर)