शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : प्रतीकसागर

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते.

कवठेएकंद : सारे दिवस एकसारखे नसतात. दु:खामागून सुख डोकावत असते. मानवी जीवन हे महान जीवन मिळाले आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जावा, असे आवाहन क्रांतिवीर मुनिश्री १0८ प्रतीकसागरजी महाराज यांनी केले.कवठेएकंद येथे समस्त जैन समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवप्रसंगी समारोप सभांच्या प्रवचनादरम्यान मुनिश्री प्रतीकसागरजी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका. कितीही बिकट परिस्थिती आली तरी, हिंमत सोडू नका. जीवनात नक्कीच आनंदमय होईल. संघर्ष म्हणजे जीवन आहे. शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या शाळेत दाखल केले म्हणजे तो मोठा माणूस होईल, हा समज चुकीचा आहे. त्याच्यामध्ये पात्रता निर्माण करा, तरच तो मोठा आदर्शवत माणूस बनू शकतो. आता बच्चे अधिक हुशार आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते. आपला समज चुकीचा आहे. बेरोजगारी ही समस्या हिंमत आणि आत्मविश्वास कमी असणाऱ्यांमध्ये आहे. कामाची तयारी ठेवा, फळ मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)