शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: February 16, 2016 00:10 IST

काडसिद्धेश्वर महाराज : आष्टा येथे ‘जयंत अ‍ॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन

आष्टा : भारतीयांनी सेंद्रीय शेतीला फाटा देऊन रासायनिक शेतीला प्राधान्य दिल्याने प्रती किलोमागे २७ मिलिग्रॅम विष अन्नातून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने शाश्वत शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी देशी गाय पाळावी, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथे माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत अ‍ॅग्रो २०१६’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काडसिध्देश्वर महाराज बोलत होते. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ. विलासराव शिंदे, मानसिंग पाटील, विश्वास पाटील, रामराव देशमुख, अशोका अ‍ॅग्री सोल्युशनचे सतीश पाटील, नंदकुमार पाटील, पी. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे उपस्थित होते. काडसिध्देश्वर महाराज म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता २५ टक्के होती. सध्या ती ३ टक्के झाली आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. शेतकऱ्याने बांधावरची शेती न करता शेतातील मातीला, पिकाला आवश्यक असणारे घटक शोधून वेळेवर द्यावेत. शेतातील जिवाणूंची संख्या घटत चालली आहे. मातीतील विष संपवण्याचे काम गाईचे शेण करते. मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, विलासराव शिंदे यांनी, जयंत अ‍ॅग्रो कृषी प्रदर्शनामुळे शेतीबाबत योग्य दिशा मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले, तर बाजार समितीचे सभापती आनंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी झुंझारराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, बाळासाहेब वाडकर, वैभव शिंदे, अशोक वग्याणी, उदय कुशिरे, सुनीता माने, संग्राम फडतरे, मोहन गायकवाड, प्रभाकर जाधव, रघुनाथ जाधव, जितेंद्र शिंदे, अनिल रूकडे, श्रीकांत कबाडे, डॉ. तुषार कणसे, सुरेश कबाडे, पपाली कचरे, विजय मोरे, समीर लतीफ उपस्थित होते. (वार्ताहर)