शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: February 16, 2016 00:10 IST

काडसिद्धेश्वर महाराज : आष्टा येथे ‘जयंत अ‍ॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन

आष्टा : भारतीयांनी सेंद्रीय शेतीला फाटा देऊन रासायनिक शेतीला प्राधान्य दिल्याने प्रती किलोमागे २७ मिलिग्रॅम विष अन्नातून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने शाश्वत शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी देशी गाय पाळावी, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथे माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत अ‍ॅग्रो २०१६’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काडसिध्देश्वर महाराज बोलत होते. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ. विलासराव शिंदे, मानसिंग पाटील, विश्वास पाटील, रामराव देशमुख, अशोका अ‍ॅग्री सोल्युशनचे सतीश पाटील, नंदकुमार पाटील, पी. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे उपस्थित होते. काडसिध्देश्वर महाराज म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता २५ टक्के होती. सध्या ती ३ टक्के झाली आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. शेतकऱ्याने बांधावरची शेती न करता शेतातील मातीला, पिकाला आवश्यक असणारे घटक शोधून वेळेवर द्यावेत. शेतातील जिवाणूंची संख्या घटत चालली आहे. मातीतील विष संपवण्याचे काम गाईचे शेण करते. मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, विलासराव शिंदे यांनी, जयंत अ‍ॅग्रो कृषी प्रदर्शनामुळे शेतीबाबत योग्य दिशा मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले, तर बाजार समितीचे सभापती आनंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी झुंझारराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, बाळासाहेब वाडकर, वैभव शिंदे, अशोक वग्याणी, उदय कुशिरे, सुनीता माने, संग्राम फडतरे, मोहन गायकवाड, प्रभाकर जाधव, रघुनाथ जाधव, जितेंद्र शिंदे, अनिल रूकडे, श्रीकांत कबाडे, डॉ. तुषार कणसे, सुरेश कबाडे, पपाली कचरे, विजय मोरे, समीर लतीफ उपस्थित होते. (वार्ताहर)