शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: February 16, 2016 00:10 IST

काडसिद्धेश्वर महाराज : आष्टा येथे ‘जयंत अ‍ॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन

आष्टा : भारतीयांनी सेंद्रीय शेतीला फाटा देऊन रासायनिक शेतीला प्राधान्य दिल्याने प्रती किलोमागे २७ मिलिग्रॅम विष अन्नातून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने शाश्वत शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी देशी गाय पाळावी, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथे माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत अ‍ॅग्रो २०१६’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काडसिध्देश्वर महाराज बोलत होते. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ. विलासराव शिंदे, मानसिंग पाटील, विश्वास पाटील, रामराव देशमुख, अशोका अ‍ॅग्री सोल्युशनचे सतीश पाटील, नंदकुमार पाटील, पी. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे उपस्थित होते. काडसिध्देश्वर महाराज म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता २५ टक्के होती. सध्या ती ३ टक्के झाली आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. शेतकऱ्याने बांधावरची शेती न करता शेतातील मातीला, पिकाला आवश्यक असणारे घटक शोधून वेळेवर द्यावेत. शेतातील जिवाणूंची संख्या घटत चालली आहे. मातीतील विष संपवण्याचे काम गाईचे शेण करते. मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, विलासराव शिंदे यांनी, जयंत अ‍ॅग्रो कृषी प्रदर्शनामुळे शेतीबाबत योग्य दिशा मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले, तर बाजार समितीचे सभापती आनंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी झुंझारराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, बाळासाहेब वाडकर, वैभव शिंदे, अशोक वग्याणी, उदय कुशिरे, सुनीता माने, संग्राम फडतरे, मोहन गायकवाड, प्रभाकर जाधव, रघुनाथ जाधव, जितेंद्र शिंदे, अनिल रूकडे, श्रीकांत कबाडे, डॉ. तुषार कणसे, सुरेश कबाडे, पपाली कचरे, विजय मोरे, समीर लतीफ उपस्थित होते. (वार्ताहर)