शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

देशविघातक शक्तींकडून शेतकरी आंदोलन हायजॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू ...

सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू केले. आता देशविघातक शक्तींकडून हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

हाके म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचेच सर्व कायदे केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. तरीही विरोधकांनी शेतकरीविरोधात हे कायदे असल्याची अफवा पसरवून याविरोधात आंदोलन पेटविले. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विचारुन शिफारसी घेतल्या आहेत. त्यांच्या टास्कफोर्सने शिफारशी दिल्या होत्या. त्यातच सुधारणा करून हा कायदा केंद्र सरकारने आणला. गेल्या सत्तर वर्षातील इंग्रजांनी आणलेले १ हजार ८०० कायदे कालबाह्य झाले होते. ते भाजपने बदलले.

उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकारने त्याचे पालन केले. शेतकऱ्यांना यापूर्वी बाजारात माल घेऊन आल्यानंतर दर ठरवण्याचा अधिकार नव्हता. तो आता या नव्या कायद्याने दिला आहे.

विरोधकांनी अपप्रचार करून कायद्याविरोधात आंदोलन उभे केले. यामागे देशविघातक संघटना आहेत. भाजपचा जनाधार वाढत असल्याने हे आंदोलन उभे केले आहे. पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. आंदोलन हे राजकीय आहे. देशभरातील २० राजकीय पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. परकीय शक्ती देशविरोधी कृती करणाऱ्या काही संघटना या आंदोलनात आहेत. नक्षली माओवाद्यांचे झेंडे आंदोलनात कसे?

चाैकट

पवारांचा तत्त्वत: विरोध नाही

शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा असताना, लोकसभेत मंजुरी मिळते आणि राज्यसभेत विरोध होतो. शरद पवारच यावेळी गैरहजर होते. शरद पवारांना या कायद्याला तत्त्वत: विरोध नाही, असेही हाके यांनी यावेळी सांगितले.