शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशविघातक शक्तींकडून शेतकरी आंदोलन हायजॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू ...

सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू केले. आता देशविघातक शक्तींकडून हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

हाके म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचेच सर्व कायदे केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. तरीही विरोधकांनी शेतकरीविरोधात हे कायदे असल्याची अफवा पसरवून याविरोधात आंदोलन पेटविले. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विचारुन शिफारसी घेतल्या आहेत. त्यांच्या टास्कफोर्सने शिफारशी दिल्या होत्या. त्यातच सुधारणा करून हा कायदा केंद्र सरकारने आणला. गेल्या सत्तर वर्षातील इंग्रजांनी आणलेले १ हजार ८०० कायदे कालबाह्य झाले होते. ते भाजपने बदलले.

उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकारने त्याचे पालन केले. शेतकऱ्यांना यापूर्वी बाजारात माल घेऊन आल्यानंतर दर ठरवण्याचा अधिकार नव्हता. तो आता या नव्या कायद्याने दिला आहे.

विरोधकांनी अपप्रचार करून कायद्याविरोधात आंदोलन उभे केले. यामागे देशविघातक संघटना आहेत. भाजपचा जनाधार वाढत असल्याने हे आंदोलन उभे केले आहे. पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. आंदोलन हे राजकीय आहे. देशभरातील २० राजकीय पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. परकीय शक्ती देशविरोधी कृती करणाऱ्या काही संघटना या आंदोलनात आहेत. नक्षली माओवाद्यांचे झेंडे आंदोलनात कसे?

चाैकट

पवारांचा तत्त्वत: विरोध नाही

शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा असताना, लोकसभेत मंजुरी मिळते आणि राज्यसभेत विरोध होतो. शरद पवारच यावेळी गैरहजर होते. शरद पवारांना या कायद्याला तत्त्वत: विरोध नाही, असेही हाके यांनी यावेळी सांगितले.