शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मिरज पश्चिम भागातील शेतकरी उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दूधगांव : कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलाचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दूधगांव : कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही. सध्या शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. लवकरात लवकर कारखान्यांनी ऊस बिलाचा हप्ता जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.

एप्रिलअखेरीस वळवाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्याची मशागतीची कामे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने कामे खोळंबली आहेत. अशातच काही शेतकऱ्यांनी अजून ऊसची भरणी केलेली नाही.

भागातील कारखान्यांनी ऊस तोडीवेळी ८०-१०-१० च्या फॉर्मवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. त्याप्रमाणे कारखाना सुरू असताना पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. फॉर्मप्रमाणे राहिलेली दहा टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आत देणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले होते. कारखाना बंद होऊन महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. मशागतीसाठी पैसे नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी मशागतीची कामे करण्यास सुरुवात करतो. कारखान्यांनी उसाचे पैसे दिले नसल्यामुळे कशाने मशागतीचे कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.