शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

मिरज पश्चिम भागातील शेतकरी उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दूधगांव : कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलाचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दूधगांव : कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही. सध्या शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. लवकरात लवकर कारखान्यांनी ऊस बिलाचा हप्ता जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.

एप्रिलअखेरीस वळवाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्याची मशागतीची कामे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने कामे खोळंबली आहेत. अशातच काही शेतकऱ्यांनी अजून ऊसची भरणी केलेली नाही.

भागातील कारखान्यांनी ऊस तोडीवेळी ८०-१०-१० च्या फॉर्मवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. त्याप्रमाणे कारखाना सुरू असताना पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. फॉर्मप्रमाणे राहिलेली दहा टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आत देणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले होते. कारखाना बंद होऊन महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. मशागतीसाठी पैसे नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी मशागतीची कामे करण्यास सुरुवात करतो. कारखान्यांनी उसाचे पैसे दिले नसल्यामुळे कशाने मशागतीचे कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.