शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

एकरकमी एफआरपीसाठी सोमवारी शेतकऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

इस्लामपूर : उसाचे गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही एफआरपीप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई ...

इस्लामपूर : उसाचे गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही एफआरपीप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नाही. सध्या कारखानदारच राज्यकर्ते झाल्यामुळे ही कारवाई होत नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सोमवारी, दि. २८ रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली.

तहसील कचेरीजवळील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीस रघुनाथदादा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सोनहिरा कारखान्याने ३१७६ रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे, तर राजारामबापू कारखान्याने २५०० रुपयांचे बिल काढले आहे. त्यांच्याकडून प्रतिटन ७०० रुपये कमी दिले आहेत. गुजरातच्या कारखान्यांशी तुलना केली असता, १५०० रुपये कमी दिले गेले आहेत. या सर्व बाबींवर विचार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या बेकायदेशीर बाबींविरुद्ध बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी केले आहे.