शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

‘टेंभू’साठी शेतकऱ्यांचा ठिय्या-: योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोल्याला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:39 IST

टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकºयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देअधिकाºयांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सांगली : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकºयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी, योजनेच्या विद्युत मोटारी बंद पडल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. दि. २५ फेब्रुवारीपासून सर्व पंप चालू करून कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील, भारत पाटील, मनोहर विभुते, बाळासाहेब यादव, वाय. एस. बाबर, संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात आटपाडी तालुक्यातील आटपाडी, भिंगेवाडी, माडगुळे, सोलापूर - सांगोला तालुक्यातील चोपडी, बलवडी, सोमेवाडी, बुध्याळ, गौरवाडी, उधणवाडी, नाझरे, हातीद, पाचिगाव बु. येथील शेकडो शेतकरी सहभागी होते.आंदोलकांनी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता गुणाले यांना मागण्यांचे निवेदन दिले. टेंभू योजनेचे पाणी बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके वाळू लागली आहेत.

आटपाडी, सांगोला तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन तातडीने टेंभू योजना सुरु करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. दुष्काळावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी टेंभू योजनेचे पाणी सोडले, तर शेतकºयांचे मोठे नुकसान टळणार आहे, अशी भूमिका मांडली.

डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता गुणाले यांची भेट घेऊन चर्चा केली. गुणाले यांनी, येत्या दहा दिवसात योजनेच्या सर्व पंप हाऊसच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत टेंभू योजना चालू करण्यात येणार आहे. लाभक्षेत्रातील शेतकºयांना शंभर टक्के पाणी मिळणार असून लाभक्षेत्राबाहेरील गावांना पाणी देण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असे आश्वासन दिले.यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. वंचितसह सर्वच गावांना पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली. डॉ. पाटणकर यांनी, आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील सर्वच गावांना पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.कालवा समितीलाच आडवे करू : पाटणकरशासनाने टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शंभर टक्के शेतकºयांना देण्याचे मान्य केले आहे. कुणीही वंचित राहाणार नाही, असे ठोस आश्वासन दिले असतानाही, कालवा समितीच्या काही सदस्यांनी लाभक्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी कालवा समितीचे सदस्य आडवे पडले, तर त्यांना आडवे करुन दुष्काळग्रस्त शेतकºयांना पाणी मिळवून देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. २५ फेब्रुवारीपर्यंत टेंभू योजनेचे पाणी आटपाडी, सांगोला तालुक्यास न मिळाल्यास, स्थगित केलेले ठिय्या आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले.सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :water transportजलवाहतूक