शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी ‘पाटबंधारे’त फायली भिरकावल्या, ‘म्हैसाळ’चा पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:35 IST

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा ...

ठळक मुद्देमालगावमधील आंदोलक-अधिकाऱ्यांत जुंपली;पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वादावर पडदा

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा पडला.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. मालगावच्या शेतकऱ्यांनीही सुमारे सात लाख रुपये जमा केले आहेत.

मात्र वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या सुरू आहेत. बागा फुलण्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. पाणी वेळेत न मिळाल्यास बागा वाया जाऊन शेतकºयांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. यामुळे मालगाव परिसरातील शेतकरी अस्वस्थ होते. पाणी वाटपाची जबाबदारी योजनेच्या अधिकाºयांकडे असताना ते नदीजवळील योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवून जतकडे पाणी नेण्याच्या नियोजनात गुंतले आहेत.

कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडले असले तरी, अधिकाºयांच्या नियोजनाअभावी पाणी पुढे सरकत नाही. पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी यापूर्वी दोनवेळा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी पाण्याची उपलब्धता नसल्याने सध्या कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडण्यात अडचणी असल्याची जुजबी उत्तरे अधिकारी देत होते. तसेच सध्या वारणेतून पाणी सोडण्यात आले अहे. मंगळवार, दि. १६ एप्रिलपर्यंत मालगावपर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन दोन्हीवेळा अधिकाºयांनी दिले असले तरी, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन व पाणी सोडण्याबाबत दिल्या जाणाºया खोट्या अश्वासनांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाव बंदचा निर्णय घेतला होता. तरीही ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयाकडून मालगाव परिसरात पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.मालगाव येथील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सांगली येथील वारणालीमधील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन अधिकारी आणि कर्मचाºयांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला. अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देऊ लागल्यामुळे त्यांनी कार्यालयातील फायलीच भिरकावल्या. कागदपत्रे सर्वत्र फेकल्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर अधिकाºयांनी संजयनगर पोलीस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे हे पोलिसांची कुमक घेऊन हजर झाले.त्यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेच्या मार्गाने मागण्या करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलक शेतकरी तेथून निघून गेले. दरम्यान, या गोंधळाबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कुणावरही गुन्हा नोंद केला नसल्याचे सांगण्यात आले.शेतकऱ्यांनी संयम ठेवावा : नलवडेताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सर्व शेतकºयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच शेतकºयांनी पैसे भरले असल्यामुळे प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तरीही मालगाव येथील प्रदीप सावंत यांच्यासह चाळीस शेतकºयांनी वारणाली येथील आमच्या कार्यालयात येऊन धिंगाणा घातला आहे. फायली भिरकावल्या असून, कार्यालयाचे नुकसानही केले आहे. पाणी टंचाई सर्वत्र असून, शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन केले पाहिजे. शेतकºयांचे आंदोलन असल्यामुळे कुणावरही गुन्हा दाखल केला नाही, असेही त्यांनी सांगितले.