शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतकऱ्यांनी ‘पाटबंधारे’त फायली भिरकावल्या, ‘म्हैसाळ’चा पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:35 IST

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा ...

ठळक मुद्देमालगावमधील आंदोलक-अधिकाऱ्यांत जुंपली;पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वादावर पडदा

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा पडला.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. मालगावच्या शेतकऱ्यांनीही सुमारे सात लाख रुपये जमा केले आहेत.

मात्र वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या सुरू आहेत. बागा फुलण्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. पाणी वेळेत न मिळाल्यास बागा वाया जाऊन शेतकºयांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. यामुळे मालगाव परिसरातील शेतकरी अस्वस्थ होते. पाणी वाटपाची जबाबदारी योजनेच्या अधिकाºयांकडे असताना ते नदीजवळील योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवून जतकडे पाणी नेण्याच्या नियोजनात गुंतले आहेत.

कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडले असले तरी, अधिकाºयांच्या नियोजनाअभावी पाणी पुढे सरकत नाही. पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी यापूर्वी दोनवेळा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी पाण्याची उपलब्धता नसल्याने सध्या कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडण्यात अडचणी असल्याची जुजबी उत्तरे अधिकारी देत होते. तसेच सध्या वारणेतून पाणी सोडण्यात आले अहे. मंगळवार, दि. १६ एप्रिलपर्यंत मालगावपर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन दोन्हीवेळा अधिकाºयांनी दिले असले तरी, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन व पाणी सोडण्याबाबत दिल्या जाणाºया खोट्या अश्वासनांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाव बंदचा निर्णय घेतला होता. तरीही ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयाकडून मालगाव परिसरात पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.मालगाव येथील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सांगली येथील वारणालीमधील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन अधिकारी आणि कर्मचाºयांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला. अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देऊ लागल्यामुळे त्यांनी कार्यालयातील फायलीच भिरकावल्या. कागदपत्रे सर्वत्र फेकल्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर अधिकाºयांनी संजयनगर पोलीस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे हे पोलिसांची कुमक घेऊन हजर झाले.त्यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेच्या मार्गाने मागण्या करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलक शेतकरी तेथून निघून गेले. दरम्यान, या गोंधळाबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कुणावरही गुन्हा नोंद केला नसल्याचे सांगण्यात आले.शेतकऱ्यांनी संयम ठेवावा : नलवडेताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सर्व शेतकºयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच शेतकºयांनी पैसे भरले असल्यामुळे प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तरीही मालगाव येथील प्रदीप सावंत यांच्यासह चाळीस शेतकºयांनी वारणाली येथील आमच्या कार्यालयात येऊन धिंगाणा घातला आहे. फायली भिरकावल्या असून, कार्यालयाचे नुकसानही केले आहे. पाणी टंचाई सर्वत्र असून, शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन केले पाहिजे. शेतकºयांचे आंदोलन असल्यामुळे कुणावरही गुन्हा दाखल केला नाही, असेही त्यांनी सांगितले.