शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

घोलेश्वरमधील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : म्हैसाळ उपसा योजनेच्या सहाव्या टप्प्यात घोलेश्वर (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : म्हैसाळ उपसा योजनेच्या सहाव्या टप्प्यात घोलेश्वर (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांनी गेल्या तेरा वर्षांपासून मोबदल्यासाठी लढा दिला आहे. तरीही त्यांना जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळाला नाही, तो त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली. या मागण्याचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडेही दिले आहे..

निवेदनात म्हटले की, म्हैसाळ सहावा टप्पा मुख्य कालव्याअंतर्गत घोलेश्वर येथील शेतकऱ्यांची शेत जमीन मुख्य कालव्यासाठी २००९ मध्ये अधिग्रहण केलेली आहे. आज अखेर शेतकऱ्यांना कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा लाभ मिळाला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार लेखी, तोंडी, प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मागणी केली आहे.

पाटबंधारे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चाही करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा आज अखेर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. मोबदला तर मिळाला नाहीच. उलट सोडलेल्या पाण्यातून शेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा, अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य, शेतकरी सलीम गवंडी यांनी दिला आहे.