शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

शेतकऱ्यांनो विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

कुपवाड : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने अतिशय चांगला असा कृषी सुधारणा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भले होणार ...

कुपवाड : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने अतिशय चांगला असा कृषी सुधारणा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याविषयी विरोधी पक्षांनी पसरविलेल्या गैरसमजाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन मंगळवारी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

बामणोली (ता. मिरज) येथे शेतकऱ्यांना हा कायदा समजावा व त्यांचा गैरसमज दूर व्हावा या हेतूने आमदार सुधीर गाडगीळ यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी संपूर्ण कृषी कायदा सांगणारी पुस्तिका आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनीही शेतकऱ्यांना कायद्याविषयी माहिती दिली.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य चिटणीस अश्रफ वांकर यांनी कायद्याविषयी विरोधक पक्षाकडून करण्यात येणाऱ्या राजकारणाविषयी स्पष्टीकरण दिले. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे रावसाहेब ऐतवडे यांनी शेतकरी सबलीकरण, संरक्षण हमीभाव, कृषिसेवा करार, कृषी उत्पादन व्यापार या विषयीच्या शंंकांचे निरसन केले. भाजपचे सांगली ग्रामीण मंडळ अध्यक्ष संतोष सरगर यांनी स्वागत केले.

बैठकीस भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, सरचिटणीस विश्वजित पाटील, बामणोलीचे सरपंच राजेश संनोळी, दीपक माने, विष्णू लवटे, अर्चना पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, सतीश राजावत, ॲड. संजय ढोले, हणमंत पाटील, संभाजी पाटील, महावीर रेवाणा, विजय रेवांणा, राजू संगमे, भरत संगमे, रावसाहेब ढोले, अनिल रेवांणा, सुशांत पाटील, निखिल पाटील, सुनील ढोले आदी उपस्थित होते.

फोटो : २२ कुपवाड ०२

ओळ : बामणोली (ता. मिरज) येथे शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी दीपक शिंदे, प्रकाश ढंग, विश्वजित पाटील, बामणोलीचे सरपंच राजेश संनोळी उपस्थित होते.