शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर

By admin | Updated: May 30, 2016 00:49 IST

दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार : पाणी, शेतीविषयक जागृती करणार

इस्लामपूर : दुष्काळाने होरपळत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच, पाणी, शेती, जमीन, मातीबद्दल अधिक जाणीव-जागृती करण्यासाठी राजारामबापू पाटील सह़ साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील गावा-गावातील ८५ शेतकऱ्यांना तीन दिवसांसाठी मराठवाड्यात पाठविले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना ही सूचना केली होती़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना निरोप दिला़ आपणास कृष्णामाईचे वरदान लाभले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ३0-३२ वर्षापूर्वी आपल्या शिवारात पाणी आणल्याने आपणास दुष्काळाच्या झळा कमी बसल्या़ निसर्गाची साथ न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला आहे़ दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या या आपल्या शेतकरी बांधवांना आधार द्या. कडक उन्हाळ्यात तेथील शेतकरी कसा जगतो, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असतानाही तेथील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी व शेतीसाठी कसा वापर करतो, हे बघा, असा संदेश विजयबापू पाटील व आऱ डी़ माहुली यांनी शेतकऱ्यांना दिला़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे शेतकरी व अधिकारी पंढरपूर, उस्मानाबाद, परळी, बीड, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील तापमान, शेती, पीकपध्दती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे स्रोत, पावसाचे प्रमाण आदी बाबींची माहिती घेणार आहेत़ हा दौरा तीन दिवसांचा आहे़ याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, शेती विभागाचे गटाधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, महेश कदम, क्लार्क विजय कुलकर्णी, तसेच बोरगावचे टी़ आऱ सलगर, नागावचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्तेल पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या वाळवा तालुक्यातील शेतकरी व अधिकाऱ्यांना राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, आऱ डी़ माहुली, व्ही़ बी़ पाटील यांनी निरोप दिला.