शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर

By admin | Updated: May 30, 2016 00:49 IST

दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार : पाणी, शेतीविषयक जागृती करणार

इस्लामपूर : दुष्काळाने होरपळत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच, पाणी, शेती, जमीन, मातीबद्दल अधिक जाणीव-जागृती करण्यासाठी राजारामबापू पाटील सह़ साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील गावा-गावातील ८५ शेतकऱ्यांना तीन दिवसांसाठी मराठवाड्यात पाठविले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना ही सूचना केली होती़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना निरोप दिला़ आपणास कृष्णामाईचे वरदान लाभले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ३0-३२ वर्षापूर्वी आपल्या शिवारात पाणी आणल्याने आपणास दुष्काळाच्या झळा कमी बसल्या़ निसर्गाची साथ न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला आहे़ दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या या आपल्या शेतकरी बांधवांना आधार द्या. कडक उन्हाळ्यात तेथील शेतकरी कसा जगतो, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असतानाही तेथील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी व शेतीसाठी कसा वापर करतो, हे बघा, असा संदेश विजयबापू पाटील व आऱ डी़ माहुली यांनी शेतकऱ्यांना दिला़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे शेतकरी व अधिकारी पंढरपूर, उस्मानाबाद, परळी, बीड, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील तापमान, शेती, पीकपध्दती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे स्रोत, पावसाचे प्रमाण आदी बाबींची माहिती घेणार आहेत़ हा दौरा तीन दिवसांचा आहे़ याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, शेती विभागाचे गटाधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, महेश कदम, क्लार्क विजय कुलकर्णी, तसेच बोरगावचे टी़ आऱ सलगर, नागावचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्तेल पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या वाळवा तालुक्यातील शेतकरी व अधिकाऱ्यांना राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, आऱ डी़ माहुली, व्ही़ बी़ पाटील यांनी निरोप दिला.