शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

ं‘म्हैैसाळ’च्या बिलाचा भार शेतकºयांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:08 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी टंचाई निधीतून बिल भरण्याचे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांनी केला आहे. पावसाळ्यात पाऊस नसल्याने द्राक्ष, ऊस व पेरणी झालेल्या पिकांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने आॅगस्ट महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुंबईत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ, ताकारी व टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ कोटी वीजबिल थकीत असल्याने म्हैसाळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे तीन साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू झाली होती.यावर्षी म्हैसाळच्या आवर्तनासाठी टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरण्याच्या आश्वासनामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केल्यानंतर म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील बागायती पिकांना पाणी उपलब्ध झाले; मात्र म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी टंचाई निधीतून भरण्यात आलेली नसून, शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी पिकांची मोजणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले. म्हैसाळचे आवर्तन पुढे सुरू ठेवण्यासाठी शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, सुमारे २५ लाख रुपये जमा झाले आहेत. टंचाई निधीतून थकीत वीजबिल न भरता मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.डोंगरवाडी योजना : पाणी सोडण्याची मागणीम्हैसाळचे आवर्तन सुरू होऊन महिना झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेवरील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने डोंगरवाडी, कळंबी, सिध्देवाडी, पाटगाव, सोनी, भोसे, करोली-एम, खंडेराजुरी, गुंडेवाडी ही गावे म्हैसाळच्या पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. डोंगरवाडीचे पाणी सोडण्यासाठी कळंबी, सोनी, भोसे परिसरातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंगरवाडी योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने डोंगरवाडी योजनेतून अद्याप पाणी सुरू करण्यात आले नसल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले.