शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

ं‘म्हैैसाळ’च्या बिलाचा भार शेतकºयांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:08 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी टंचाई निधीतून बिल भरण्याचे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांनी केला आहे. पावसाळ्यात पाऊस नसल्याने द्राक्ष, ऊस व पेरणी झालेल्या पिकांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने आॅगस्ट महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुंबईत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ, ताकारी व टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ कोटी वीजबिल थकीत असल्याने म्हैसाळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे तीन साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू झाली होती.यावर्षी म्हैसाळच्या आवर्तनासाठी टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरण्याच्या आश्वासनामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केल्यानंतर म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील बागायती पिकांना पाणी उपलब्ध झाले; मात्र म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी टंचाई निधीतून भरण्यात आलेली नसून, शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी पिकांची मोजणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले. म्हैसाळचे आवर्तन पुढे सुरू ठेवण्यासाठी शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, सुमारे २५ लाख रुपये जमा झाले आहेत. टंचाई निधीतून थकीत वीजबिल न भरता मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.डोंगरवाडी योजना : पाणी सोडण्याची मागणीम्हैसाळचे आवर्तन सुरू होऊन महिना झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेवरील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने डोंगरवाडी, कळंबी, सिध्देवाडी, पाटगाव, सोनी, भोसे, करोली-एम, खंडेराजुरी, गुंडेवाडी ही गावे म्हैसाळच्या पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. डोंगरवाडीचे पाणी सोडण्यासाठी कळंबी, सोनी, भोसे परिसरातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंगरवाडी योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने डोंगरवाडी योजनेतून अद्याप पाणी सुरू करण्यात आले नसल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले.