शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

शेतकऱ्यांनो धीर धरा...भाजीपाल्याचा दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे ...

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे दर खूपच कमी झाले. उत्पादन खर्चही पदरात न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ढब्बू, वांगी, कारली काढून टाकली. सध्या सर्वच भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढून किलोला १० ते १५ रुपये झाला आहे. आणखी दर वाढेल, शेतकऱ्यांनो लाखमोलाचा भाजीपाला काढून टाकू नका.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, गवार, कोबी, फ्लाॅवर या भाजीपाल्यास मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु, कोलकात्ता, दिल्ली येथे मोठी मागणी आहे, परंतु या शहरात आजही कोरोनाची भीती असल्यामुळे शासकीय कार्यालये, हॉटेल, वसतिगृह पूर्ण क्षमतेने चालू नाही. यामुळे भाजीपाल्यास मागणी नाही, म्हणूनच ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्यास दर नव्हता. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, कोबी, फ्लाॅवरला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पिकांवर नांगरच फिरवला. यातून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सध्या दर दुपटीने वाढला असून प्रत्येक भाजीपाल्यास दहा ते पंधरा रुपये किलोच्या पुढे दर झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे येत्या महिन्यात आणखी भाजीपाल्याची दरवाढ होईल, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भाजीपाल्याचे होलसेल दर (प्रति किलो)

भाजीचा प्रकार पूर्वीचा दर आजचा दर

ढब्बू ३ रुपये १२ ते १५ रुपये

वांगी ७ १८ ते २०

दोडका ५ १२ ते १५

कारली ३ ते ५ १० ते १२

कोबी २ ते ३ ७ ते १०

फ्लाॅवर ४ ते ५ १० ते १५

गवार १० ते १२ २० ते २५

भेंडी १२ ते १५ २५ ते ३०

कोट

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येत्या महिन्यात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकण्याची घाई करु नये. असणाऱ्या भाजीपाल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-मनोज गाजी, कृषी अभ्यासक, आष्टा.

चौकट

ऊस परवडत नसल्यामुळे भाजीपाला

उसाला दर नाही, म्हणून वाळवा, मिरज, पलूस, तासगाव, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाचवेळी बाजारात भाजीपाला जास्त आल्यामुळे मागील महिन्यात दोन ते तीन रुपये किलो दोडका, ढब्बू, कारल्याचा दर झाला. येथे तरुण शेतकरी खूपच खचल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावरच नांगर फिरवला.