शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो धीर धरा...भाजीपाल्याचा दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे ...

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे दर खूपच कमी झाले. उत्पादन खर्चही पदरात न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ढब्बू, वांगी, कारली काढून टाकली. सध्या सर्वच भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढून किलोला १० ते १५ रुपये झाला आहे. आणखी दर वाढेल, शेतकऱ्यांनो लाखमोलाचा भाजीपाला काढून टाकू नका.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, गवार, कोबी, फ्लाॅवर या भाजीपाल्यास मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु, कोलकात्ता, दिल्ली येथे मोठी मागणी आहे, परंतु या शहरात आजही कोरोनाची भीती असल्यामुळे शासकीय कार्यालये, हॉटेल, वसतिगृह पूर्ण क्षमतेने चालू नाही. यामुळे भाजीपाल्यास मागणी नाही, म्हणूनच ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्यास दर नव्हता. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, कोबी, फ्लाॅवरला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पिकांवर नांगरच फिरवला. यातून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सध्या दर दुपटीने वाढला असून प्रत्येक भाजीपाल्यास दहा ते पंधरा रुपये किलोच्या पुढे दर झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे येत्या महिन्यात आणखी भाजीपाल्याची दरवाढ होईल, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भाजीपाल्याचे होलसेल दर (प्रति किलो)

भाजीचा प्रकार पूर्वीचा दर आजचा दर

ढब्बू ३ रुपये १२ ते १५ रुपये

वांगी ७ १८ ते २०

दोडका ५ १२ ते १५

कारली ३ ते ५ १० ते १२

कोबी २ ते ३ ७ ते १०

फ्लाॅवर ४ ते ५ १० ते १५

गवार १० ते १२ २० ते २५

भेंडी १२ ते १५ २५ ते ३०

कोट

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येत्या महिन्यात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकण्याची घाई करु नये. असणाऱ्या भाजीपाल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-मनोज गाजी, कृषी अभ्यासक, आष्टा.

चौकट

ऊस परवडत नसल्यामुळे भाजीपाला

उसाला दर नाही, म्हणून वाळवा, मिरज, पलूस, तासगाव, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाचवेळी बाजारात भाजीपाला जास्त आल्यामुळे मागील महिन्यात दोन ते तीन रुपये किलो दोडका, ढब्बू, कारल्याचा दर झाला. येथे तरुण शेतकरी खूपच खचल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावरच नांगर फिरवला.