शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो धीर धरा...भाजीपाल्याचा दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे ...

सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे दर खूपच कमी झाले. उत्पादन खर्चही पदरात न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ढब्बू, वांगी, कारली काढून टाकली. सध्या सर्वच भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढून किलोला १० ते १५ रुपये झाला आहे. आणखी दर वाढेल, शेतकऱ्यांनो लाखमोलाचा भाजीपाला काढून टाकू नका.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, गवार, कोबी, फ्लाॅवर या भाजीपाल्यास मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु, कोलकात्ता, दिल्ली येथे मोठी मागणी आहे, परंतु या शहरात आजही कोरोनाची भीती असल्यामुळे शासकीय कार्यालये, हॉटेल, वसतिगृह पूर्ण क्षमतेने चालू नाही. यामुळे भाजीपाल्यास मागणी नाही, म्हणूनच ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्यास दर नव्हता. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, कोबी, फ्लाॅवरला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पिकांवर नांगरच फिरवला. यातून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सध्या दर दुपटीने वाढला असून प्रत्येक भाजीपाल्यास दहा ते पंधरा रुपये किलोच्या पुढे दर झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे येत्या महिन्यात आणखी भाजीपाल्याची दरवाढ होईल, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भाजीपाल्याचे होलसेल दर (प्रति किलो)

भाजीचा प्रकार पूर्वीचा दर आजचा दर

ढब्बू ३ रुपये १२ ते १५ रुपये

वांगी ७ १८ ते २०

दोडका ५ १२ ते १५

कारली ३ ते ५ १० ते १२

कोबी २ ते ३ ७ ते १०

फ्लाॅवर ४ ते ५ १० ते १५

गवार १० ते १२ २० ते २५

भेंडी १२ ते १५ २५ ते ३०

कोट

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येत्या महिन्यात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकण्याची घाई करु नये. असणाऱ्या भाजीपाल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-मनोज गाजी, कृषी अभ्यासक, आष्टा.

चौकट

ऊस परवडत नसल्यामुळे भाजीपाला

उसाला दर नाही, म्हणून वाळवा, मिरज, पलूस, तासगाव, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाचवेळी बाजारात भाजीपाला जास्त आल्यामुळे मागील महिन्यात दोन ते तीन रुपये किलो दोडका, ढब्बू, कारल्याचा दर झाला. येथे तरुण शेतकरी खूपच खचल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावरच नांगर फिरवला.