शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आटपाडी तालुक्यातील शेतकरी अवकाळीच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीचा पुरेपूर अनुभव सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. अवकाळी पाऊस आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देणार, अशी घोषणा करणाऱ्या सरकारची मदत शिमगा आला तरीही मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अजून किती दिवस वाट पाहायची असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.

गेल्या जूनपासून आटपाडी तालुक्यात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. सलग ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे आणि विशेषतः डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळिंबावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला. त्यामुळे शेतकरी हबबल झाले. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत मिळेल, ही आशा मात्र फोल ठरली.

पंचनामे होऊन सहा महिने होऊन गेले; परंतु आटपाडी तालुक्यातील दहा गावांतील शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाचीही मदत शासनाने केलेली नाही. तालुक्यातील शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाची वाडी आणि झरे या गावांतील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी चार लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.

अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसाठी दहा हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये हेक्टर या दराने दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ही तुटपुंजी का असेना, पण मदत मिळणे गरजेचे होते. मात्र, अद्याप शेतकरी तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयात मदत कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत.

चौकट

शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार?

दिनांक २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली. दि. १ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला. १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी होती, त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात काही गावांतील शेतकऱ्यांना मदत दिली आहे. उर्वरित दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल

- सचिन मुळीक

तहसीलदार, आटपाडी.