शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खतांच्‍या दरवाढीने शेतकरी वर्गात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. खत कंपन्यांनी प्रतिबॅग तीनशे ते सातशे रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पादनात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड सद्यस्थितीत सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आवश्यक कागदपत्रेही मिळत नाहीत. तरीही खत कंपन्‍यांकडून भाववाढ यंदा भाववाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होणार नाही असे

काही नामांकित खत कंपन्यांकडून

सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र बहुतांशी सर्व कंपन्यांनी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची

लाट असून याचा उद्रेक होण्यापूर्वी केंद्र सरकारने लक्ष द्यावे खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

चौकट :

अशी झाली आहे दरवाढ

डीएपी खताची किंमत १२०० रुपयांवरून १९०० रुपयांवर तर १०-२६-२६ ची किंमत ११७५ रुपयांवरून १७७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय १२:३२:१६ ची किंमत ११९० वरून १८०० तर २०:२०:० ची किंमत ९७५ वरून १३५० झाली आहे. पोटॅश ८५० वरून १००० रुपयांवर गेले आहे. सुपर फॉस्फेट (पावडर) ३७० वरून ४७० तर सुपर फॉस्फेट (दाणेदार)४०० वरून ५०० वर पोहोचले आहे. खतांच्या कंपनीनुसार कमीजास्त प्रमाणात अशीच भाववाढ झाली आहे.