शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खतांच्‍या दरवाढीने शेतकरी वर्गात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. खत कंपन्यांनी प्रतिबॅग तीनशे ते सातशे रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पादनात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड सद्यस्थितीत सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आवश्यक कागदपत्रेही मिळत नाहीत. तरीही खत कंपन्‍यांकडून भाववाढ यंदा भाववाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होणार नाही असे

काही नामांकित खत कंपन्यांकडून

सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र बहुतांशी सर्व कंपन्यांनी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची

लाट असून याचा उद्रेक होण्यापूर्वी केंद्र सरकारने लक्ष द्यावे खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

चौकट :

अशी झाली आहे दरवाढ

डीएपी खताची किंमत १२०० रुपयांवरून १९०० रुपयांवर तर १०-२६-२६ ची किंमत ११७५ रुपयांवरून १७७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय १२:३२:१६ ची किंमत ११९० वरून १८०० तर २०:२०:० ची किंमत ९७५ वरून १३५० झाली आहे. पोटॅश ८५० वरून १००० रुपयांवर गेले आहे. सुपर फॉस्फेट (पावडर) ३७० वरून ४७० तर सुपर फॉस्फेट (दाणेदार)४०० वरून ५०० वर पोहोचले आहे. खतांच्या कंपनीनुसार कमीजास्त प्रमाणात अशीच भाववाढ झाली आहे.