शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

विजापूर-गुहागर मार्गासाठी शेतकऱ्यांचे पलूसमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर जाधव म्हणाले, या रस्त्यास शेतकऱ्यांनी कधीच विरोध केलेला नाही. योग्य मोबदला द्यावा व पूर्ण रुंदीचा ...

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर जाधव म्हणाले, या रस्त्यास शेतकऱ्यांनी कधीच विरोध केलेला नाही. योग्य मोबदला द्यावा व पूर्ण रुंदीचा व पूर्ण क्षमतेचा रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी शेतकरी आग्रही आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे सध्या रस्त्याची वाताहत झाली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी मोजणीचे आदेश दिलेले होते. त्यानुसार मोजणी प्रक्रिया चालूच आहे. परंतु या काळात रस्त्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने या कालावधित जनतेला चांगला सर्व्हिस रोड देणे बंधनकारक असताना सुद्धा, याकडे मुद्दाम राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांना रस्ता अडविल्याबाबत दोष देत आहेत. या सर्व रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेस सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत. शेवटच्या शेतकऱ्याला मोबदला मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

या आंदोलनात मारुती चव्हाण, पोपट संकपाळ, विनायक गोंदिल, प्रकाश पाटील, सत्यवान संकपाळ, अरविंद वाघमारे, विनायक मोहिते, नूर मोहम्मद, महेंद्र कांबळे, प्रताप चव्हाण, श्रीकांत जाधव, अरुण पाटील यांनी सहभाग घेतला.

कोट

शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर सकारात्मक निर्णय झाला आहे. येत्या दोन आठवड्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या रस्त्याचे काम मार्गी लागेल.

- अरुण लाड, आमदार