शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

भवानीनगरजवळ दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

इस्लामपूर : कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने आबासाहेब बाजीराव पाटील (वय ...

इस्लामपूर : कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने आबासाहेब बाजीराव पाटील (वय ४५, रा. येडेमच्छिंद्र) हे शेतकरी ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी घडला. या अपघाती मृत्यूप्रकरणी दुुचाकी चालक अविराज भागवत सावंत (रा. बिचूद) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आबासाहेब पाटील हे ५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास शेतातून पायी चालत घरी निघाले होते. त्यावेळी तासगाव बाजूने दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या अविराज सावंत याच्या निष्काळजीपणाने दुचाकीची धडक पाटील यांना बसली. यामध्ये पाटील यांच्या डोक्यात, कपाळावर आणि हातापायाला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. हवालदार उत्तम तुकाराम माळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.