शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत २२ रोजी शेतकरी एल्गार मेळावा

By admin | Updated: July 14, 2017 23:04 IST

सांगलीत २२ रोजी शेतकरी एल्गार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य शासनाने कर्जमाफीच्या आदेशामध्ये अनेक त्रुटी ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणूनच या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची जनजागरण यात्रा दि. २२ रोजी सांगलीत येणार आहे. यानिमित्ताने सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दि. २२ रोजी सकाळी १० वाजता शेतकरी एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार व हमाल चळवळीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांनी दिली.विविध शेतकरी संघटनांची शुक्रवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत, या मागण्यांसाठी जनजागरण यात्रा सुरु आहे. ही यात्रा दि. २२ जुलैस सांगलीत येणार आहे. त्यानिमित्ताने सांगलीत मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांची जनजागृती करून सांगलीतील मेळावा यशस्वी करणार आहे. सोमवारपासून तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, ध्वनिक्षेपकावरून प्रचार करणे, गाववार बैठका घेऊन प्रचार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवारी मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांची आरग येथे बैठक, सायंकाळी कवठेमहंकाळ येथे, तर रात्री शिरढोण येथे बैठक होणार आहे. मंगळवारी कवठेएकंद (ता. तासगाव), पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, इस्लामपूर व शिराळा येथेही बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॉम्रेड उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, अ‍ॅड्. के. डी. शिंदे यांनी आभार मानले.यावेळी कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, सुमन पुजारी, शशिकांत गायकवाड, विकास मगदूम, सुभाष पवार, अशोक खाडे, सचिन पाटील, तुळशीराम गळवे, सम्मेद पाटील, कॉ. दिगंबर कांबळे, नितीन महिंद, विकास भोसले आदी बैठकीस यावेळी उपस्थित होते.सरकारविरोधात लढणार : देशमुखशासनाने कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांना फसविले आहे. शासनाने कर्जमाफीसाठी ठरवलेल्या निकषामुळे गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. कर्जाची फिरवाफिरवी केलेला शेतकरी वंचित राहत आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरची रक्कम अगोदर भरण्यास सांगितले जात आहे. पाऊस लांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यास यातून बाहेर काढण्याची गरज असताना, सरकार त्यांची परीक्षा पाहत आहे. शेतकरी आता हारणार नाही, तर हातात रूमण घेऊन सरकारच्या विरोधात लढणार आहे, असा इशाराही कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला.