शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

येडेनिपाणीत शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील शेतकरी शंकर महादेव पाटील (वय ४५) यांचा शेतामध्ये चारा मशीनवर काम करताना ...

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील शेतकरी शंकर महादेव पाटील (वय ४५) यांचा शेतामध्ये चारा मशीनवर काम करताना विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी, शेतकरी शंकर पाटील बुधवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले होते. शेतातील शेडमध्ये कडबाकुट्टी मशीनवर चारा बारीक करत असताना त्यांना विजेचा जोरात शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले. थोड्या वेळाने मुलगा शुभम शेतात आला असता, वडील बेशुद्ध अवस्थेत दिसले. वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही विजेचा धक्का लागला. यावेळी बाजूला असणारे चुलतभाऊ नागेश पाटील व गजानन पाटील या शेतकऱ्यांनी वीज बंद करून त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पाटील यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.