शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

फरारी साधकांची छायाचित्रे प्रसिद्ध करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. डॉ. एम. एन. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांची नावे पुढे आली. सध्या फरारी असलेल्या साधकांची छायाचित्रे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी केली.डॉ. दाभोलकरांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. डॉ. एम. एन. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांची नावे पुढे आली. सध्या फरारी असलेल्या साधकांची छायाचित्रे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी केली.डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी, सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. याचा जाब विचारण्यासाठी अंनिसतर्फे स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘जवाब दो’ हे आंदोलन करण्यात आले. तीनही विचारवंतांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अजूनही मारेकरी सापडत नसल्याने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप अंनिसच्या पदाधिकाºयांनी केला.या आंदोलनात प. रा. आर्डे, राहुल थोरात, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. तारा भवाळकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. नितीन शिंदे, विजयकुमार जोखे, अजय भालकर, फारुख गवंडी, मुनीर मुल्ला, सुनील भिंगे, नामदेव करगणे, अमित शिंदे, अमित ठाकर, डॉ. संजय निटवे, ज्योती आदाटे यांच्यासह जिल्ह्यातील सव्वाशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.राज्यपाल विद्यासागर राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाभोलकर, पानसरे यांची एकापाठोपाठ एक अशी हत्या झाली. या दोन्ही प्रकरणांचा तपास अपूर्ण आहे. महाराष्टÑात अशा समाजसुधारकांचे खून व्हावेत, ही प्रगतशील महाराष्टÑासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. कर्नाटक राज्यात कलबुर्गी यांची अशाचप्रकारे हत्या झाली.तीनही विचारवंतांचे मारेकरी अजूनही फरारी आहेत. राज्य शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करुनही तपासात काहीच प्रगती दिसून येत नाही. डॉ. वीरेंद्र तावडेच्या अटकेनंतर तपास पुढे सरकला नाही. जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत, तोपर्यंत समाजातील विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम राहणार आहे.भरपावसात आंदोलनसांगली शहरात रविवारी दिवसभर पाऊस सुरु होता. तरीही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. दाभोलकरांच्या मारेकºयांची पत्रके वाटण्यात आली. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्र य शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांच्यातर्फे जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी निवेदन स्वीकारले.